शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! 90 जणांना Remdesivir चा झाला त्रास; 'या' जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 14:53 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला होता. त्यामुळे सरकारने या बाबत एक निश्चित धोरण आखले.

रायगड - जिल्ह्यातील हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन मागे घेण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. संबंधीत कंपनीच्या विनंतीवरुनच हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 28 आणि 29 एप्रिल रोजी विविध ठिकाणच्या 90 जणांना या इंजेक्शनमुळे त्रास झाल्याच्या तक्रारी आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी लोकमतशी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला होता. त्यामुळे सरकारने याबाबत एक निश्चित धोरण आखले. जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे यावर थेट नियंत्रण आणले. त्यामुळे खासगी औषधाच्या दुकानात रेमडेसिवीरच्या विक्रीवर बंधणे आली. जिल्ह्यासाठी ठराविक पुरवठादार यांची नियुक्ती करुन त्यांच्या मार्फतच नोंदणी केलेल्या रुग्णालयांना याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे काळाबाजारावर नियंत्रण आलेच शिवाय काही खासगी डॉक्टर हेच इंजेक्शन अव्वाच्या सव्वा किंमतीमध्ये रुग्णांना देत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर नियंत्रण आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

28 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडूनसुमारे 510 रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले होते. पैकी 310 इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टोचण्यात आल्याने सुमारे 90 रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने कोविकोफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल 21013 इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत, असेही मठपती यांनी सांगितले.  कोणत्या रुग्णालयातील रुग्णांना या इंजेक्शनचा त्रास झाला याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडremdesivirरेमडेसिवीरIndiaभारत