शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

coronavirus: मुलांना जेवायला मिळेल, मात्र गुरांच्या चारा-पाण्यासाठी मला डिस्चार्ज द्या! काेविड रुग्णांची सुट्टीसाठी कारणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:45 IST

Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला.

- आविष्कार देसाई  रायगड : ''माझ्या मुलांना शेजारचे जेवायला देतील. मात्र, माझ्या गुरा-ढाेरांना चारा काेण देईल, आता मला रुग्णालायतून लवकरच सुट्टी द्या” अशी विनंती रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाने केल्याचे समारे आले आहे. रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी विविध कारणे दिली जात आहेत. त्यामुळे डाॅक्टरही चक्रावून गेले आहेत.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला. रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी काही रुग्ण विविध कारणे सांगून डाॅक्टरांसह नर्स यांचा चांगलाच पिच्छा पुरवच आहेत. रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी देण्यात येणारी कारणे ऐकून डाॅक्टरही चक्रावून गेले आहेत. मात्र,  पूर्ण उपचारानंतरच रुग्णांना सुट्टी दिली जात आहे. डिस्चार्जसाठी काेणती कारणे सांगितली जातात?-  माझा मुलगा खासगी कंपनीमध्ये नाेकरी करताे. माझ्यामुळे त्याला दिवस-रात्र रुग्णालयाबाहेर थांबावे लागत  आहे. मला सुट्टी देत नाही, तोपर्यंत माझा मुलगाही येथून जाणार  नाही, त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे.-  माझा मुलगा लहान आहे,  मला घरी जाणे आवश्यक आहे, माझ्या नवऱ्याला नीट लक्ष देता येणार नाही. घरी खूप आडचण होईल, मला सोडले नाही, तर मी रुग्णालयातून पळून जाईल. - मला बाहेर इतर ठिकाणी झोपच लागत नाही, दुसऱ्या ठिकाणी कधी राहिलेच नाही, नवीन ठिकाणी मला भीती वाटते, मला लवकर डिस्चार्ज करा.- मला सुट्टी दिली नाही, तर मी शेजारच्या बेडवर झोपेन, असा हट्टही एका रुग्णाने धरला. डाॅक्टरांनी त्याचे बाेलणे मनावर घेतले नाही. मात्र, ताे रुग्ण जाणून-बुजून शेजारच्या बेडवर जाऊन झाेपत हाेता. त्यामुळे नाकीनऊ आले हाेते. - माझ्या मुलांना शेजारी जेवायला देतील, त्यांना काय हवे नकाे ते सर्व देतील, परंतु माझ्या गुरा-ढाेरांना चारा-पाणी काेण देईल, मला सुट्टी दिली नाही, तर गुरा-ढाेरांचे हाल हाेतील. सात दिवस उपचार करून नंतर साेडले जाते घरीसध्या जिल्ह्यात काेराेनाचा प्रभाव  कमी हाेत आहे. त्याचप्रमाणे,  रुग्णांना काेराेनाचा संसर्ग हा कमी प्रमाणात असल्याने त्यांच्यावर याेग्य उपचार करून त्यांना किमान सात दिवसांनी सुट्टी देण्यात येत आहे. अगदीच संसर्गाचे प्रमाण अधिक असल्यास त्यांना सुट्टी देण्यास उशीर हाेतो. मात्र, सुट्टी मिळाल्यानतंरही रुग्णांनी वेळेवर औषधे घेऊन  जास्तीतजास्त आराम करायचा  आहे. याबरोबर योग्य आहार  घ्यायचा आहे.रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी रुग्णांकडे विविध कारणे तयार असायचीच. त्यामध्ये काही मजेशीर असायची, तर काही रुग्ण समस्या सांगून सुट्टी मागत हाेते. काेराेना हा संसर्ग परसवणारा आजार असल्याने रुग्ण बरा हाेत नाही, ताेपर्यंत त्याला डिस्चार्ज देण्यात आला नाही. - डाॅ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड