शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:47 IST

तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोना विषाणुचा मुकाबला करताना प्रशासनाची सर्व शक्ती कोरोनासाठी खर्च होत आहे. त्यामुळे नियमीत आणि दैनंदीन कामांचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाईचा प्रश्न हाताळताना प्रशासनाला काळजी घ्यावी लागत आहे. कडक उन्हाच्या झळा वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होत आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल २९२ गाव-वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. ५१ हजार ७६३ नागरिकांना ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रखर उन्हाचा तडाखा वाढ आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी नागकिरांना संघर्ष करावा लागत आहे. जिह्यात मोठ्या संख्येने पाऊस पडून देखील योग्य नियोजना अभावी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.sतलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पेण तालुक्याला याची अधिक झळ बसली आहे. येथील ११ गावे आणि ८२ वाड्या अशा एकूण ९३ ठिकाणच्या २२ हजार २५० नागरिकांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाच्या कालावधीत पाणीटंचाईवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कोणत्याच ठिकाणी पाण्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे, अशा गाव, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा होत आहे.२९२ गावांना टँकरने पाणी : उरण तालुक्यातील ५ वाड्यांमधील ९९८ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील ५ गावे, ५ वाड्या एकूण १० गाव/वाड्यांमधील ४ हजार ८०५ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जतमधील ३ गावे, १० वाड्या एकूण १३ गाव/वाड्यांमधील एक हजार ५६० नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालापूरमधील १ गाव, ४ वाड्या अशा ५ गाव/वाड्यांमधील १ हजार ५५० नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील २ गावे, ४ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील १ हजार ४०५ नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील ४ गावे, २ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ८९६ नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीने एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाडमधील ७ गावे, ५५ वाड्या अशा ६२ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ३६५ नागरिकांना ५ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोलादपूरमधील ३० गावे, ५७ वाड्या अशा ८७ गाव/वाड्यांमधील एकूण ११ हजार २३० नागरिकांना ६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. श्रीवर्धनमधील एका गावातील ३४८ नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुरुडमधील एका गावातील ७४० नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तळा तालुक्यातील १ गाव, २ वाड्या, ३ गाव/वाड्यांमधील एकूण १ हजार ६१६ नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यांमधील एकूण ६६ गावे, २२६ वाड्या अशा मिळून एकूण २९२ गाव/वाड्यांमधील एकूण ५१ हजार ७६३ नागरिकांना ३० खासगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने एक अशा ३१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे,- सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), रायगड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwater scarcityपाणी टंचाईRaigadरायगड