शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:47 IST

तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोना विषाणुचा मुकाबला करताना प्रशासनाची सर्व शक्ती कोरोनासाठी खर्च होत आहे. त्यामुळे नियमीत आणि दैनंदीन कामांचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाईचा प्रश्न हाताळताना प्रशासनाला काळजी घ्यावी लागत आहे. कडक उन्हाच्या झळा वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होत आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल २९२ गाव-वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. ५१ हजार ७६३ नागरिकांना ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रखर उन्हाचा तडाखा वाढ आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी नागकिरांना संघर्ष करावा लागत आहे. जिह्यात मोठ्या संख्येने पाऊस पडून देखील योग्य नियोजना अभावी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.sतलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पेण तालुक्याला याची अधिक झळ बसली आहे. येथील ११ गावे आणि ८२ वाड्या अशा एकूण ९३ ठिकाणच्या २२ हजार २५० नागरिकांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाच्या कालावधीत पाणीटंचाईवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कोणत्याच ठिकाणी पाण्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे, अशा गाव, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा होत आहे.२९२ गावांना टँकरने पाणी : उरण तालुक्यातील ५ वाड्यांमधील ९९८ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील ५ गावे, ५ वाड्या एकूण १० गाव/वाड्यांमधील ४ हजार ८०५ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जतमधील ३ गावे, १० वाड्या एकूण १३ गाव/वाड्यांमधील एक हजार ५६० नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालापूरमधील १ गाव, ४ वाड्या अशा ५ गाव/वाड्यांमधील १ हजार ५५० नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील २ गावे, ४ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील १ हजार ४०५ नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील ४ गावे, २ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ८९६ नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीने एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाडमधील ७ गावे, ५५ वाड्या अशा ६२ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ३६५ नागरिकांना ५ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोलादपूरमधील ३० गावे, ५७ वाड्या अशा ८७ गाव/वाड्यांमधील एकूण ११ हजार २३० नागरिकांना ६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. श्रीवर्धनमधील एका गावातील ३४८ नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुरुडमधील एका गावातील ७४० नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तळा तालुक्यातील १ गाव, २ वाड्या, ३ गाव/वाड्यांमधील एकूण १ हजार ६१६ नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यांमधील एकूण ६६ गावे, २२६ वाड्या अशा मिळून एकूण २९२ गाव/वाड्यांमधील एकूण ५१ हजार ७६३ नागरिकांना ३० खासगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने एक अशा ३१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे,- सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), रायगड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwater scarcityपाणी टंचाईRaigadरायगड