शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Coronavirus : विनाकारण फॅशन म्हणूून मास्क घालू नका, बाजारात मिळणाऱ्या मास्कवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:54 IST

कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत.

अलिबाग  - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. सॅनिटायझरची किंमत दुपटीने वाढली आहे, तर मास्कच्या किमतीही शंभर रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा भुर्दंड पडत आहे. मुळात असे कोणतेच मास्क वापरण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिला आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनीच मास्कचा वापर आवश्यक असल्याकडेही लक्ष वेधले.कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. या विषाणूचा फैलाव मानवी संपर्कातून अगदी सहजतने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून मास्क लावलेजात आहेत. सध्या बाजारातउपलब्ध असणारे मास्क विकत घेण्याक डे नागरिकांचा मोठ्या संख्येने कल असल्याचे दिसते. मात्र ज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनाच एन-९५ हे मास्क लावण्यात येते. तसेच त्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉययांनीच मास्क वापरणे अधिक गरजेचे आहे.सध्या बाजारात सॅनिटायझर आणि मास्कचाही तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी तर मास्कच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. महागडी किंमत मोजून घेतलेले बाजारातील मास्क जास्त दिवस टिकतही नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास मास्कच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. मात्र हीच संधी हेरून रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये टेलरकडून असे मास्क शिवून ते विकले जात आहेत. मात्र असे मास्क घेणे टाळणे गरजेचे आहे. असे मास्क कोठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तयार करण्यात आले आहेत म्हणजेच ते हायजीन आहेत का, हेही तपासून पाहणे आवश्यक असल्याकडे डॉ. गवई यांनी लक्ष वेधले.कपड्याच्या गुणवत्तेवरून आणि लहान-मोठ्या आकारावरून याची किंमत ठरविण्यात आली आहे. २०, २५ आणि ३० रु पयांच्या किमतीत हे मास्क बाजारात विकले जात आहेत. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.कोरोनापासून वाचायचे असेल तर खबरदारी म्हणून नागरिकांनी लोकांशी थेट संपर्क टाळावा. गर्दी टाळून घरातच राहणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना नाका-तोंडावर रुमार धरावा, सातत्याने हात धुवावेत. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये.- डॉ. प्रमोद गवई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड