शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : विनाकारण फॅशन म्हणूून मास्क घालू नका, बाजारात मिळणाऱ्या मास्कवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:54 IST

कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत.

अलिबाग  - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. सॅनिटायझरची किंमत दुपटीने वाढली आहे, तर मास्कच्या किमतीही शंभर रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा भुर्दंड पडत आहे. मुळात असे कोणतेच मास्क वापरण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिला आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनीच मास्कचा वापर आवश्यक असल्याकडेही लक्ष वेधले.कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. या विषाणूचा फैलाव मानवी संपर्कातून अगदी सहजतने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून मास्क लावलेजात आहेत. सध्या बाजारातउपलब्ध असणारे मास्क विकत घेण्याक डे नागरिकांचा मोठ्या संख्येने कल असल्याचे दिसते. मात्र ज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनाच एन-९५ हे मास्क लावण्यात येते. तसेच त्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉययांनीच मास्क वापरणे अधिक गरजेचे आहे.सध्या बाजारात सॅनिटायझर आणि मास्कचाही तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी तर मास्कच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. महागडी किंमत मोजून घेतलेले बाजारातील मास्क जास्त दिवस टिकतही नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास मास्कच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. मात्र हीच संधी हेरून रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये टेलरकडून असे मास्क शिवून ते विकले जात आहेत. मात्र असे मास्क घेणे टाळणे गरजेचे आहे. असे मास्क कोठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तयार करण्यात आले आहेत म्हणजेच ते हायजीन आहेत का, हेही तपासून पाहणे आवश्यक असल्याकडे डॉ. गवई यांनी लक्ष वेधले.कपड्याच्या गुणवत्तेवरून आणि लहान-मोठ्या आकारावरून याची किंमत ठरविण्यात आली आहे. २०, २५ आणि ३० रु पयांच्या किमतीत हे मास्क बाजारात विकले जात आहेत. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.कोरोनापासून वाचायचे असेल तर खबरदारी म्हणून नागरिकांनी लोकांशी थेट संपर्क टाळावा. गर्दी टाळून घरातच राहणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना नाका-तोंडावर रुमार धरावा, सातत्याने हात धुवावेत. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये.- डॉ. प्रमोद गवई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड