शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : विनाकारण फॅशन म्हणूून मास्क घालू नका, बाजारात मिळणाऱ्या मास्कवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:54 IST

कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत.

अलिबाग  - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. सॅनिटायझरची किंमत दुपटीने वाढली आहे, तर मास्कच्या किमतीही शंभर रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा भुर्दंड पडत आहे. मुळात असे कोणतेच मास्क वापरण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिला आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनीच मास्कचा वापर आवश्यक असल्याकडेही लक्ष वेधले.कोरोना या घातक विषाणूने जगभरात प्रकोप माजवला आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. या विषाणूचा फैलाव मानवी संपर्कातून अगदी सहजतने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून मास्क लावलेजात आहेत. सध्या बाजारातउपलब्ध असणारे मास्क विकत घेण्याक डे नागरिकांचा मोठ्या संख्येने कल असल्याचे दिसते. मात्र ज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांनाच एन-९५ हे मास्क लावण्यात येते. तसेच त्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉययांनीच मास्क वापरणे अधिक गरजेचे आहे.सध्या बाजारात सॅनिटायझर आणि मास्कचाही तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी तर मास्कच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. महागडी किंमत मोजून घेतलेले बाजारातील मास्क जास्त दिवस टिकतही नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास मास्कच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. मात्र हीच संधी हेरून रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये टेलरकडून असे मास्क शिवून ते विकले जात आहेत. मात्र असे मास्क घेणे टाळणे गरजेचे आहे. असे मास्क कोठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तयार करण्यात आले आहेत म्हणजेच ते हायजीन आहेत का, हेही तपासून पाहणे आवश्यक असल्याकडे डॉ. गवई यांनी लक्ष वेधले.कपड्याच्या गुणवत्तेवरून आणि लहान-मोठ्या आकारावरून याची किंमत ठरविण्यात आली आहे. २०, २५ आणि ३० रु पयांच्या किमतीत हे मास्क बाजारात विकले जात आहेत. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.कोरोनापासून वाचायचे असेल तर खबरदारी म्हणून नागरिकांनी लोकांशी थेट संपर्क टाळावा. गर्दी टाळून घरातच राहणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना नाका-तोंडावर रुमार धरावा, सातत्याने हात धुवावेत. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये.- डॉ. प्रमोद गवई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड