शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

coronavirus: रायगडमधील कोरोनाबाधितांवर जिल्ह्यातच होणार उपचार, मुंबईची क्षमता संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 02:47 IST

जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सापडलेल्या रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र, त्यांची क्षमता संपल्याने रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत.

 - आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीला जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सापडलेल्या रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र, त्यांची क्षमता संपल्याने रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचा दावा केला जात आहे. अपुरे मनुुष्यबळ आणि साधनांची कमतरता यावरच प्रशासनाची कसोटी लागणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाचीदेखील झोप उडाली आहे. त्यातच आता मुंबई-ठाणे या विभागातील नागरिक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्याच्या विविध भागात येत आहेत. सुमारे दीड लाखाहून अधिक नागरिक येण्याची शक्यता आहे. याआधीच सुमारे एक लाख ३५ हजारांहून अधिक नागरिक दाखल झाले आहेत.तिसºया टप्प्यातील लॉकडाउन संपून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होण्याला तीनच दिवसांचा अवधी उरला आहे. याच कालावधीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यातील नागरिकांनी आता पुन्हा रायगडची वाट धरली आहे. रेड झोन, कोरोनाबाधित क्षेत्रातून हे नागरिक येत असल्याने जिल्ह्यामध्ये धोका वाढला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.सुरुवातीला जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र, तेथील स्थानिक पातळीवरील रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने अन्य जिल्ह्यातील येणाºया रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार करणे कठीण जाणार आहे. कारण या रुग्णालयांची खाटांची संख्या संपली असल्याने रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहे. याची सुरुवात बुधवारी रात्रीपासूनच करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत अलिबागच्या सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दोन रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी सर्व सरकारी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत.सरकारी रु ग्णालयांत९० डॉक्टर कार्यरतअलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये २० आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये (जिजामाता रुग्णालय) ७० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. १० हजार ६५७ पीपीई किट उपलब्ध आहेत. १० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सरकारी ९० डॉक्टर आहेत.डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी खासगी व्यवसाय करणाºया डॉक्टरांनाही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली. व्हेंटिलेटरची संख्या कमी असली तरी खासगी रुग्णालयाकडून घेण्यात येणार आहेत. १०० मध्ये एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्राथमिक आरोग्यकेंद्रातील नर्स, डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनाही आता पीपीई किट द्यावे, अशी मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे. कारण बाहेरून नागरिक हे गावागावांमध्ये आलेले आहेत. त्यामुळे कसलाही त्रास जाणवल्यास त्यांना सुरुवातीला प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्येच जावे लागणार असल्याने तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका पोहोचू शकतो.अलिबाग शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक सातत्याने येत असतात. सुरुवातीला शहरांची नाकाबंदी करण्यात आली होती. जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्याने काही अटी, शर्ती शिथिल करण्यात आल्या. मात्र, या कालावधीत रेडझोनमधून मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत असल्याने सर्तक राहावे लागणार आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात सातत्याने साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा, तोंडाला मास्क लावावे, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी.-प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड