शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

coronavirus: अडकलेल्या १३,४९० चाकरमान्यांचे महाड तालुक्यात आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:57 IST

महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यामध्ये कामधंदा, नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कु टुंबे मुंबई-पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या मूळगावी परत येत आहेत

दासगाव : देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि लॉकडाउनमुळे राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागांमध्ये व्यवसाय आणि नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेले नागरिक आता आपल्या घराकडे येऊ लागले आहेत. महाड तालुक्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत १२,५२४ नागरिकांचे आगमन झाले तर त्यानंतर १३ मेपर्यंत ९६६ नागरिकांचे आगमन झाले, असे एकू णतालुक्यांमध्ये १३ हजार ४९० नागरिकांचे आगमन झाले असल्याची नोंद महाड पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली आहे.महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यामध्ये कामधंदा, नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कु टुंबे मुंबई-पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या मूळगावी परत येत आहेत; परंतु आपल्याच गावामध्ये येण्यासाठी ग्रामस्थांना अनेक अडणींना सामोरे जावे लागत आहे.बाहेरून येणाºया नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यांची प्रथम आरोग्य तपासणी करून क्वारंटाइन करण्यात आले. आलेल्या नागरिकांची व्यवस्था पाहण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेविका, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पंचायतीचे सदस्य, लोकप्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने क्वारंटाइन नागरिकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करायची आहे. याबाबत तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.गावांत सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनमहाड तालुक्यांमध्ये आतापर्यंत आलेल्या नागरिकांची संख्या १३,४९० असून, या सर्व नागरिकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.गावांमध्ये आलेल्या नागरिकांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. आलेल्या नागरिकांची व्यवस्था पाहण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड