शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:59 IST

रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे.

उरण -  रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे किनारी परिसरात आढळणाऱ्या माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना मत्स्य दुष्काळाची चिंता भेडसावत आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये करंजा, मोरा हा परिसर पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र काही मंडळींनी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ धरून मासेमारी व्यवसायात वृद्धी केली आहे. यासाठी उरण दिघोडे गावात मत्स्यप्रक्रि येबाबत सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाहून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यांतही निर्यात केली जाते; परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे. किनाºयालगत तसेच खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे.‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ फिशरीज एज्युकेशन’ या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील १२५ माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षात पर्ससीन जाळ्यांचा वापर तसेच एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यात वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असली तरी सागरी प्रदूषणही वाढले आहे.पनवेल कोळीवाडा हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळबाधित झाले. तर माजगाव, मुरु ड, नांदगाव, राजापुरी दिघी, तुरूंबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीटीबाधित गव्हाण हनुमान कोळीवाडा, पाणजे गाव, कारंजा इन्फ्रा प्रोजेक्टमुळे बाधित करंजा गाव व सात पाडे या समुद्रकिनाºयावरील खाडीलगतच्या परिसर प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी मच्छीमारांवर उपासमारीचे सावट पसरले आहे.खारफुटीची कत्तल संवर्धनात अडचणीडिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरु स्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, नवे प्रकल्प व येणाºया कोस्टल रोडमुळे खारफुटीची बेसुमार कत्तल होत असल्याने मत्स्य संवर्धनात अडचणी येत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार