शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रायगडमधील गड-किल्ल्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:38 AM

प्रकल्प स्वराज्य अंतर्गत उपक्रम । ‘श्री शिवसह्याद्री’चा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

वैभव गायकर

पनवेल : रायगड जिल्ह्यात एकूण ६४ गड-किल्ले आहेत. यापैकी काही किल्ले राज्य पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहेत. मात्र, त्यानंतरही आणखी काही दुर्लक्षित लहान-मोठे गड आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांवर आहे; परंतु विविध कारणांमुळे हे गड दुर्लक्षित राहिले आहेत. या दुर्लक्षित गड-किल्ल्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आता संवर्धन केले जाणार आहे. प्रकल्प स्वराज्य अंतर्गत जिल्ह्यातील हे गड-किल्ले संरक्षित होणार आहेत.

या दृष्टीने जिल्हाधिकारी रायगड विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने प्रकल्प स्वराज्य तयार करण्यात आला आहे. गड-किल्ले संवर्धनासाठी श्री शिवसह्याद्री संस्थेने १५० पानांचा हा प्रकल्प तयार करून जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. महाराष्ट्राला गड-किल्ल्याचे वरदान प्राप्त झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेले हे गड-किल्ले काही प्रमाणात दुर्लक्षित झाले आहेत. शासनाकडून हव्या त्या पद्धतीने या गड-किल्ल्याचे संवर्धन झाले नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनीच यात पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रायगड जिल्हा किल्ले संवर्धन व पर्यटन विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दुर्लक्षित किल्ले विकसित केले जाणार आहेत. याकरिता स्थापन केलेल्या प्रकल्प स्वराज्यनुसार पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये कर्नाळा, प्रबळगड, पेब (विकटगड), घोसाळा तसेच सरसगड आदीचा समावेश आहे.या किल्ल्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये किल्ल्याच्या पायवाटा सुधारणा, किल्ल्यावरील पाणथळी स्वच्छ करणार, पर्यटकांसाठी मार्गदर्शन, दिशादर्शक फलक उभारणार, स्थानिक लोकांना प्रक्रियेत सहभागी करून त्यांना प्रशिक्षण देऊन पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम केले जाणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, गड-किल्ले आदीचा विकास करून पर्यटनवाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, याचा ऊहापोह या प्रकल्प स्वराज्यमध्ये करण्यात आला आहे. श्री शिवसह्याद्री संस्थेचे अध्यक्ष रोहित काटकर व संस्थापक सदस्य सागर मुंडे यांनी जून २०१९ मध्ये हा प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे.जिल्हाधिकाºयांनीही या प्रकल्पाची स्तुती केली आहे.रायगड जिल्हा किल्ले संवर्धन व पर्यटन विकास समिती याकरिता विविध कंपन्यांचे सीएसआर फंडचा निधीदेखील उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी नियुक्त केलेले प्रतिनिधी संबंधित कंपनीला या प्रकल्पांतर्गत माहिती देणारआहेत. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात नेमलेल्या पाच किल्ल्यांतील एका किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन१प्रकल्प स्वराज्यनुसार पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये कर्नाळा, प्रबळगड, पेब (विकटगड), घोसाळा तसेच सरसगड आदीचा समावेश आहे. या किल्ल्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे.२किल्ल्याच्या पायवाटा सुधारणार, किल्ल्यावरील पाणथळी स्वच्छ करणार, पर्यटकांसाठी मार्गदर्शन, दिशादर्शक फलक उभारणार, स्थानिक लोकांना प्रक्रियेत सहभागी करून त्यांना प्रशिक्षण देऊन पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम केले जाणार आहे. डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड