शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

नाणार प्रकल्पाबाबत संमिश्र आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 00:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी विनाशकारी प्रकल्प असा शिक्का मारून या प्रकल्पाला हद्दपार केले. आता तोच प्रकल्प रायगड जिल्ह्यात विसावण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील राजकीय नेते आणि नागरिकांच्या या प्रकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार असे बोलले जात असेल, तरी या ४० गावातील जमीन तेलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरणार नाही शिवाय प्रकल्पाला सलग जमिनीची आवश्यकता असल्याने या जमिनीचा वापर नेमक्या कोणत्या उद्देशासाठी करण्यात येणार हे गुलदस्त्यातच आहे.नाणारमधील प्रकल्पाला रत्नागिरी जिल्ह्यातून विरोध झाल्याने नक्कीच हा घातक प्रकल्प असणार त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात उभारू नये. प्रकल्पासाठी जमीन देणार नाही असा पवित्रा म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी घेतला.विकास प्रकल्पांना जिल्ह्यात कायम विरोधच झाला आहे. गावात रोजगार नाही म्हणून रोजगाराच्या शोधात नागरिक मुंबईसह अन्य ठिकाणी जातात. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. रोहा तालुक्यातही अनेक धोकादायक रासायनिक प्रकल्प आहेत. त्यामुळे कोणाचेच नुकसान झालेले नसल्याने रोजगाराच्या संधी देणाऱ्या प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे असे मत रोहा तालुक्याचे माजी शिक्षण सभापती नितीन परब यांनी व्यक्त केले. विकासाला चालना मिळत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असेल तर प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सार्थक जाधव यांनी स्पष्ट केले.प्रकल्प रोहा व मुरु ड तालुक्यात येणार असल्याचे बोलले जाते. स्थानिकांना रोजगारामध्ये ८० टक्के प्राधान्य दिल्यास या प्रकल्पाविषयी सहमती असेल असे मुरुड तालुक्याचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील शेकापने प्रकल्पासाठी नव्याने भूसंपादन करण्यास विरोध केला आहे. मात्र, सरकारकडे उपलब्ध असणाºया जमिनीवर तो उभारण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. अलिबागमधील शिवसेनेने अद्यापही या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बैठक पार पडणार असून शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प