शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नाणार प्रकल्पाबाबत संमिश्र आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 00:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी विनाशकारी प्रकल्प असा शिक्का मारून या प्रकल्पाला हद्दपार केले. आता तोच प्रकल्प रायगड जिल्ह्यात विसावण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील राजकीय नेते आणि नागरिकांच्या या प्रकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार असे बोलले जात असेल, तरी या ४० गावातील जमीन तेलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरणार नाही शिवाय प्रकल्पाला सलग जमिनीची आवश्यकता असल्याने या जमिनीचा वापर नेमक्या कोणत्या उद्देशासाठी करण्यात येणार हे गुलदस्त्यातच आहे.नाणारमधील प्रकल्पाला रत्नागिरी जिल्ह्यातून विरोध झाल्याने नक्कीच हा घातक प्रकल्प असणार त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात उभारू नये. प्रकल्पासाठी जमीन देणार नाही असा पवित्रा म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी घेतला.विकास प्रकल्पांना जिल्ह्यात कायम विरोधच झाला आहे. गावात रोजगार नाही म्हणून रोजगाराच्या शोधात नागरिक मुंबईसह अन्य ठिकाणी जातात. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. रोहा तालुक्यातही अनेक धोकादायक रासायनिक प्रकल्प आहेत. त्यामुळे कोणाचेच नुकसान झालेले नसल्याने रोजगाराच्या संधी देणाऱ्या प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे असे मत रोहा तालुक्याचे माजी शिक्षण सभापती नितीन परब यांनी व्यक्त केले. विकासाला चालना मिळत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असेल तर प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सार्थक जाधव यांनी स्पष्ट केले.प्रकल्प रोहा व मुरु ड तालुक्यात येणार असल्याचे बोलले जाते. स्थानिकांना रोजगारामध्ये ८० टक्के प्राधान्य दिल्यास या प्रकल्पाविषयी सहमती असेल असे मुरुड तालुक्याचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील शेकापने प्रकल्पासाठी नव्याने भूसंपादन करण्यास विरोध केला आहे. मात्र, सरकारकडे उपलब्ध असणाºया जमिनीवर तो उभारण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. अलिबागमधील शिवसेनेने अद्यापही या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बैठक पार पडणार असून शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प