शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

नाणार प्रकल्पाबाबत संमिश्र आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 00:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी विनाशकारी प्रकल्प असा शिक्का मारून या प्रकल्पाला हद्दपार केले. आता तोच प्रकल्प रायगड जिल्ह्यात विसावण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील राजकीय नेते आणि नागरिकांच्या या प्रकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार असे बोलले जात असेल, तरी या ४० गावातील जमीन तेलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरणार नाही शिवाय प्रकल्पाला सलग जमिनीची आवश्यकता असल्याने या जमिनीचा वापर नेमक्या कोणत्या उद्देशासाठी करण्यात येणार हे गुलदस्त्यातच आहे.नाणारमधील प्रकल्पाला रत्नागिरी जिल्ह्यातून विरोध झाल्याने नक्कीच हा घातक प्रकल्प असणार त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात उभारू नये. प्रकल्पासाठी जमीन देणार नाही असा पवित्रा म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी घेतला.विकास प्रकल्पांना जिल्ह्यात कायम विरोधच झाला आहे. गावात रोजगार नाही म्हणून रोजगाराच्या शोधात नागरिक मुंबईसह अन्य ठिकाणी जातात. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. रोहा तालुक्यातही अनेक धोकादायक रासायनिक प्रकल्प आहेत. त्यामुळे कोणाचेच नुकसान झालेले नसल्याने रोजगाराच्या संधी देणाऱ्या प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे असे मत रोहा तालुक्याचे माजी शिक्षण सभापती नितीन परब यांनी व्यक्त केले. विकासाला चालना मिळत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असेल तर प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सार्थक जाधव यांनी स्पष्ट केले.प्रकल्प रोहा व मुरु ड तालुक्यात येणार असल्याचे बोलले जाते. स्थानिकांना रोजगारामध्ये ८० टक्के प्राधान्य दिल्यास या प्रकल्पाविषयी सहमती असेल असे मुरुड तालुक्याचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील शेकापने प्रकल्पासाठी नव्याने भूसंपादन करण्यास विरोध केला आहे. मात्र, सरकारकडे उपलब्ध असणाºया जमिनीवर तो उभारण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. अलिबागमधील शिवसेनेने अद्यापही या प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बैठक पार पडणार असून शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प