शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जिद्दीच्या जोरावर साकारली सिने-कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 03:38 IST

हाड या गावी शशिकांत यांचा जन्म झाला. परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने उच्च शिक्षण घेता आले नाही. इयत्ता तिसरीमध्ये असताना क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकावला.

कुलदीप घायवट

रायगड- हाड या गावी शशिकांत यांचा जन्म झाला. परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने उच्च शिक्षण घेता आले नाही. इयत्ता तिसरीमध्ये असताना क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर, इयत्ता पाचवीमध्ये असताना मराठी एक अंकी नाटकामधूनदेखील पहिला क्रमांक पटकावला व नटराजाची मूर्ती बक्षीस म्हणून मिळाली. त्यानंतर, या क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि या आवडीमुळेच छोटी-मोठी नाटके लिहीत गेलो. कविता लिहीत गेलो. कलाक्षेत्राची आवड मनामध्ये रुजल्याने प्रत्येक गोष्टीत कला दिसून येत असायची. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे कला क्षेत्रात कसे पुढे जाणचे, याचा मार्ग मिळत नव्हता.

वडील भिकूराम खासगी कंपनीमध्ये काम करत होते. घरचा सर्व कारभार त्यांच्यावर होता. आजोबा रामचंद्र व आई लक्ष्मी हे दोघे शेतात काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मी, बहीण शर्मिला, लहान भाऊ सुधीर आम्ही महाडच्या पिंपळवाडीतील शाळेत शिक्षण घेत होतो. गावामध्ये आई-वडिलांच्या प्रेमाबरोबर गावातील लहान-थोरांचेसुद्धा मला प्रेम मिळाले. वयाच्या पंधराव्या वर्षी मी मुंबईला आलो. मुंबई शहर माझ्यासाठी नवीन होते, पण थोड्याच दिवसांत मी मुंबईला आपलेसे केले. एक दिवस वडिलांसोबत चेंबूरच्या नटराज टॉकीजमध्ये ‘मिलन’ चित्रपट पाहिला. त्यानंतर, अनेक चित्रपट पाहिले. तेव्हापासून कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करावे असे वाटत होते, पण परिस्थिती हलाखीची असल्याने पुढे काही करता आले नाही. बिकट परिस्थितीतून मार्ग काही सापडत नव्हता. घराची जबाबदारी वाढत होती. तीन मुले त्यांचा सांभाळ, घराचा सांभाळ या गोष्टी करून आपली आवड जपणे चालू ठेवले होते. सिनेमाची कथा तयार होती. मात्र, सिनेमासाठी निर्माते मिळत नव्हते. अनेक नामवंत निर्माते, दिग्दर्शकांसोबत बैठकी झाल्या. कोणी नाक मुरडत होते, तर कोणी हसत होते, तर काहींनी विचार करून सांगू म्हणून टाळाटाळ करत असायचे. या सर्वांच्या नकारामुळे सर्व सोडून घर सांभाळावे, असे वाटत होते. मात्र, नंतर मनातील जिद्दीने पुन्हा उठून उभे केले. स्वत:च चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. स्वत: लिहिलेल्या चित्रपटावर निर्मिती करत असल्याने, घरांतून सुरुवातीला कसे जमणार, असा विचार करत होते. मात्र, नंतर सर्वांनी पाठिंबा दिला.आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा होतो आणि तरुणाई कशा प्रकारे बिघडते, यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. पनवेल येथील आदगी या गावी राम पाटील यांच्या पुढाकाराने शूटिंगसाठी जागा देण्यात आली, तसेच मानखुर्द येथील स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यात आले. २५ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण चित्रपटात तयार करण्यात आला. या चित्रपटात एकूण ७ गाणी आहेत. अजिंक्य देव, निशीगंधा वाडकर, विजय पाटकर, भाऊ कदम अशा नामवंत कलाकारांनी माझ्या कामाचे कौतुक केले. माझ्या कलेचा आदर केला जात असल्याचे पाहून माझ्यातील जिद्दीत भर पडत गेली. प्रत्येक जण माझ्या मदतीला आला आणि ‘बेजार’ चित्रपटाची निर्मिती झाली. ‘बेजार’च्या टीमने व कलाकारांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले, त्यामुळे उत्तम चित्रपट उभा राहिला.

चित्रपट निर्मिती करणे हे मला स्वप्न वाटत होते. मात्र, माझ्या परिवाराने आणि पत्नी सोनी तांबे हिने मला खूप सहकार्य केले. शशिकांत सावंत, जे. जे. सावंत, पनवेलमधील राम भेईर, मोरेश्वर भोईर, योगेश प्रधान मदतीला धावून आले होते. शूटिंगच्या वेळी माझे मित्र जितेंद्र गुंडकर, उमेश कदम, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण जाधव, पटकथा लिहिणारे शंकर शेगडे आणि सेटवरील सर्व मित्रांनी जबाबदारीने कामे केली, त्यामुळेच चित्रपट बनविता आला.मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरातील अजिंक्य चाळीत राहणाऱ्या शशिकांत तांबे यांनी चित्रपट लेखन करून स्वत: निर्मिती केली आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी हे नवे आव्हान स्विकारले. अनेक नामवंत निर्माते दिग्दर्शकांनी चित्रपट निर्मिती करण्यास नकार दिला. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले. मूळचे महाड येथील राहणारे तांबे सातवी पास आहेत. मात्र, त्यांनी स्वत: हे धाडस केले. स्वत:कडील पैसे एकत्र करून पत्नीच्या नावाने प्रॉडक्शन हाउस तयार केले. या कामासाठी त्यांना घरच्यांचा विशेषत: पत्नीचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे तांबे सांगतात.

 

टॅग्स :Raigadरायगडcinemaसिनेमा