शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची दखल न घेतल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:32 IST

रोहा येथे बैठक : मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आक्रमक

धाटाव : तांबडी घटनेतील अत्याचार व खून प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा सोमवारी प्रचंड आक्रमक झाला. राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातील समन्वयकांनी रोहा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेत पुढील भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप का भेट दिली नाही, असे म्हणत नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई झाल्यास, दुर्लक्ष झाल्यास थेट मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचा भव्य मोर्चा निघेल. याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा राज्याचे समन्वयक संभाजी पाटील यांनी यावेळी दिला.राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तांबडी गावातील पीडितेच्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अनेकांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. अल्पवयीन पीडितेच्या अत्याचार प्रकरणात नक्की आरोपी किती, पोलीस प्रशासनाकडून अजून काही कागदपत्रे दिली जात नाहीत, तांबडीची क्रूर घटना ठरवून असावी, असे म्हणत १२० ब अन्वये चौकशी करण्यात यावी. प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा नेऊ, मराठा समाजाची नव्याने ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, अशा भावना स्थानिक पदाधिकारी व समन्वयकांनी व्यक्त केल्या.जिल्ह्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून झाल्याची घटना घडली आणि संबंध राज्यात खळबळ उडाली. त्या घटनेवर सर्वंकष समाज मुख्यत: मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून सबंधीत प्रकरण फास्ट ट्रकवर चालावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, सरकारी वकील नेमून जलद करावे, अशी मागणी केली. तांबडी प्रकरणावर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला. अनेक जिल्ह्यांतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर सोमवारी अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, सांगली, लातूर, मुंबई, नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वकांनी रोह्यात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीला राज्य समनवयक वीरेंद्र पवार संभाजी पाटील, रामभाऊ गायकवाड, महेश डोंगरे, सुनील नागणे, रायगड समन्वयक विनोद साबळे, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या : तांबडी अत्याचार प्रकरण हे दुसरी कोपर्डीची घटना वाटावी असेच आहे. पीडित कुटुंब भयभीत आहे, त्यांच्यावर दबाव आणले जाते, दडपण आहे. पोलीस उपविभागीय आधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्याकडेच तपास असायला हवे होते. आरोपीला जात-धर्म नाही. आदिवासी विरुद्ध मराठा संघर्ष नको, आदिवासी शब्द टाळू या, असे बैठकीत ठरले. त्यानंतर, सर्व पदाधिकाºयांनी तांबडी येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. दुसरीकडे कोपर्डी घटनेत दोषींना फाशी दिली असती, तर तांबडी येथे अशी घटना घडली नसती, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घटनास्थळी भेट द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया समन्वयकांनी दिली. कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या, या घटनेत काही षडयंत्र असल्यास या प्रकरणाचा मूळ सूत्रधार कोण आहे, याचाही शोध घ्यावा, असे या दरम्यान समन्वयकांकडून सांगण्यात आले.मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारारायगडमधील तांबडीची घटना भयानक आहे. भगिनीला न्याय मिळविण्यासाठी अधिकाºयांना भेटणे, निवेदन देणे फार उपयोगाचे नाही, थेट मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा नगरचे समन्वयक संभाजी पाटील यांनी दिला. अत्याचारात अजून कोणी मास्टरमाइंड आहे का? तसा संशय येत आहे, तपासावर आम्ही समाधानी नाही. तपास योग्य दिशेने झाले पाहिज, तसेच हा चोरीचा प्रकरण नाही. बलात्कार, हत्या केल्याचे आहे, मराठा विरुद्ध आदिवासी वाद वाढवू नका, असा इशारा रायगडचे समन्वयक विनोद साबळे यांनी आदिवासी नेत्यांना दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख