शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांच्या आवारात रासायनिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:52 IST

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आहेत.

- सिकंदर अनवारदासगाव  - महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आहेत. या पिंपामध्ये कोणत्या प्रकारची केमिकल आहेत, याचा कोणालाच थांगपत्ता नाही. बंद कारखान्यांनी उघड्यावर ठेवलेल्या रसायनाची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रीव्ही कारखान्यात एवढी मोठी दुर्घटना घडली असताना अद्याप प्रशासनाकडून उघड्यावर ठेवलेल्या रसायने आणि संबंधित कंपन्यांवर कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे पुन्हा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार, एखादा कारखाना अगर कंपनी बंद केल्यानंतर त्याबाबतची माहिती एमआयडीसी किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला देणे आवश्यक आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कागदोपत्री बंद झाले असले, तरी छुप्या पद्धतीने आजही सुरूच आहेत. प्रत्यक्षात कारखाना उत्पादन करत नसला तरी मोकळ्या जागांवर रसायनाची भरलेली पिंपे, गोणी, भंगार दिसून येत आहेत. काही ठिकाणी भंगाराच्या नावाखाली रासायनिक घनकचरा, सांडपाणी पडलेले दिसते. एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा प्रीव्हीसारखी दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.महाड औद्योगिक क्षेत्रातील निंबुज फार्मा हा कारखाना कधीच बंद झाला आहे. या बंद कारखान्याच्या प्लॉटमध्ये आजही मोठ्या प्रमाणात केमिकल भरलेली पिंपे पडून आहेत. याचा वाली कोण, या पिंपांमध्ये कोणते रसायन आहे, नक्की याच कारखान्याच्या आहेत की कोणी गोदाम बनवून उघड्यावर केमिकलचा साठा केला आहे. यासंदर्भात प्रशासनाला माहिती आहे की नाही? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये उघड्यावर केमिकल हाताळले जात आहेत. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा नाही. प्रीव्ही कारखान्याच्या सुरक्षा यंत्रणेमुळे कारखाना आणि परिसर वाचले. मात्र, उघड्या प्लॉटमध्ये आग लागली तर जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख कारखाने वगळले तर छोट्या कारखान्यांमधून कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. छोट्या कारखान्यांच्या परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त रसायन सांडलेले दिसून येते. मोकळ्या आणि उघड्या जागेवर रसायनाने भरलेले पिंप उन्हात पडून आहेत. कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही नियम पाळले गेलेले दिसून येत नाही. एखादी आगीसारखी दुर्घटना घडल्यास आगरोधक अशी सुरक्षा यंत्रणा येथे कार्यरत नाही. छोट्या कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येते.कारखाना निरीक्षकांवरकारवाई कराकारखान्यातील परिसर, कामगार सुरक्षा आदीबाबत कारखाना निरीक्षकांनी वेळोवेळी कंपन्यांना सूचना करणे आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतरच कारखाना निरीक्षक औद्योगिक क्षेत्रात फेरफटका मारतात. यामुळे कारखानदाराचे फावत असून बेदरकारपणे वागत सुरक्षिततेवर कोणतेच लक्ष देत नाही. यामुळे कारखाना निरीक्षकांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून जे कारखाने नियमांचे उल्लंघन करीत आहेत, त्यांना नोटिसा काढून प्रादेशिक अधिकारी आणि कार्यकारी अभियंतामार्फत कारवाई करण्यात येईल.- बाळासाहेब झंजे, औद्योगिक विकास महामंडळप्रदूषण नियंत्रणमंडळ फक्त नावालाकारखाना बंद केल्यानंतर रासायनिक माल इमारतीमध्ये आणि परिसरात तसाच पडून आहे. यामुळे महाडमधील ग्रामस्थ, भटक्या जनावरांना याचा फटका बसू शकतो. पावसाळ्यात उघड्यावरील रसायन पाण्यात मिसळते. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशी केली असता, जागेची मालकी एमआयडीसीची असल्याने त्यांनी कारवाई करावी, असे उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी दिले.भंगारापासून धोका कायममहाड औद्योगिक क्षेत्रात अनेक भंगार अड्डे आहेत. त्या सर्व भंगार अड्ड्यांचे मालक परप्रांतीय आहेत. गेल्या ३० वर्षांच्या इतिहासात एकही स्थानिकाला येथील कारखान्यांमधून मोठा भंगाराचा ठेका देण्यात आलेला नाही. हे भंगार अड्डे फक्त कारखानदारांच्या भंगारसाठीच वसलेले आहेत.बहुतेक अड्ड्यांवर कारखान्यांचे केमिकल देखील हाताळण्यात येते. मात्र, या भंगार अड्ड्यांवर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. कारवाईची वेळ आल्यानंतर पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवतात. काही वर्षांपूर्वी आपटे या कारखान्यात भंगार कटिंगचे काम सुरू होते. अचानक स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर तीन वर्षांपूर्वी एका भंगार अड्ड्यावर केमिकल हाताळताना चार कामगारांचा वायुगळतीने मृत्यू झाला होता.वर्षभरापूर्वी एका भंगार अड्ड्याला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल आठ तास लागले. शिवाय या वेळी संपूर्ण गाव खाली करण्यात आले होते. मात्र, या भंगार अड्ड्यावर काय जळत होते, कोणते केमिकल होते, याचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही. त्यामुळे बेकायदेशीर असणाºया या भंगार गोदामावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

टॅग्स :Raigadरायगडpollutionप्रदूषणnewsबातम्या