शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती : चंद्रकांत पाटील यांनी घेतला कामाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 14:22 IST

गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे, यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे दिले. 

- जयंत धुळपअलिबाग - गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे, यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल येथे दिले. यासंदर्भात पाटील यांनी शुक्रवारी सायन-पनवेल ते पळस्पे या दरम्यान महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर पनवेल शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.  

पाटील यांनी गेल्या आठवड्यात (31 ऑगस्ट) महामार्ग पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा त्यांनी आजच्या बैठकीत घेतला. गणेश चतुर्थीसाठी भाविक कोकणाकडे निघण्याआधी खड्डे भरुन रस्ता रहदारीस योग्य करुन देण्याबाबत पाटील यांनी सूचना केल्या. रस्त्याच्या भूसंपादन कामातील शिल्लक कामांचाही आढावा त्यांनी घेतला. आता संपूर्ण महामार्गाचे काम गतीने व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान पाटील यांनी पळस्पे फाट्यापर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते कोकण भवन येथे सुनावणी कामकाजासाठी रवाना झाले.

महामार्ग टप्पा पनवेल ते इंदापूर :  या दरम्यान 84.6 किमी रस्त्याच्या कामात  6 मोठे पूल असून 25 लहान पूल आहेत, एक फ्लाय ओव्हर असून 3 रेल्वे पूल आहेत. 15 सब वे (पादचाऱ्यांसाठी), 12 सब वे ( वाहनांसाठी) असून अन्य 12 मोठ्या तर 94 लहान रस्ते छेदक आहेत. या दरम्यान एकूण 52 बस थांबे असून  4 ठिकाणी ट्रक थांबे आहेत. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८