शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट आर्थिक व्यवहार करताना खबरदारी आवश्यक, वर्षभरात 44 सायबर गुन्ह्यात 2 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 16:45 IST

 इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर  विश्वातील  आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथे केले. 

- जयंत धुळप

रायगड - इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर  विश्वातील  आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथे केले. 

‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हा पोलीस व रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी पारसकर बोलत होते. 

यावेळी अपर जिल्हा पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक ईश्वर शिवसांब स्वामी, रायगड पोलीस जनसंपर्क अधिकारी पोलीस निरिक्षक आर.एन.राजे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

पारस्कर पूढे म्हणाले, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या उपक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर गुन्हे हे बहूतांश आर्थिक गुन्हे असतात शिवाय सोशल मिडियात वावरतांना आपल्या वर्तनाने समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही. याची दक्षता घेणो आवश्यक असल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.

दरम्यान,  रायगड जिल्ह्यात गतवर्षभरात सायबर क्राईम अंतर्गत एकूण 44 गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये एकुण 2 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. यापैकी 7 गुन्ह्यांचा तपास करुन आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे.  या सात गुन्ह्यांथी निगडीत रक्कम 31 लाख 18 हजार 609 रुपये आहे. अन्य पाच गुन्ह्याचा देखील तपास पूर्ण झाला असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक ईश्वर शिवसांब स्वामी यांनी यावेळी दिली. 

जिल्ह्यातील या 44 सायबर क्राईम पैकी 23 गुन्हे बॅन्क एटीएमशी संबंधीत आहेत. दरम्यान विविध बॅन्कांच्या एटीएम केबिन मध्ये एकापेक्षा अधिक एटीएम मशिन्स असणो वा एटीएम मशीन व खात्यात पैसे भरण्याचे मशीन असणो अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. एकावेळी केबिन मध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींनी असणो हे गुन्ह्याला निमंत्रण देणारे ठरु शकते. ही परिस्थिती बदलण्याकरीता सर्व बॅंकांना याबाबत तत्काळ कळविण्यात येईल असे स्वामी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कार्यशाळेत सायबर सुरक्षा, सिटीझन पोर्टल, मोबाईल अॅप विषयक माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

टॅग्स :RaigadरायगडCrimeगुन्हा