शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इंटरनेट आर्थिक व्यवहार करताना खबरदारी आवश्यक, वर्षभरात 44 सायबर गुन्ह्यात 2 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 16:45 IST

 इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर  विश्वातील  आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथे केले. 

- जयंत धुळप

रायगड - इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर  विश्वातील  आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथे केले. 

‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हा पोलीस व रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी पारसकर बोलत होते. 

यावेळी अपर जिल्हा पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक ईश्वर शिवसांब स्वामी, रायगड पोलीस जनसंपर्क अधिकारी पोलीस निरिक्षक आर.एन.राजे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

पारस्कर पूढे म्हणाले, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या उपक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर गुन्हे हे बहूतांश आर्थिक गुन्हे असतात शिवाय सोशल मिडियात वावरतांना आपल्या वर्तनाने समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही. याची दक्षता घेणो आवश्यक असल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.

दरम्यान,  रायगड जिल्ह्यात गतवर्षभरात सायबर क्राईम अंतर्गत एकूण 44 गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये एकुण 2 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. यापैकी 7 गुन्ह्यांचा तपास करुन आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे.  या सात गुन्ह्यांथी निगडीत रक्कम 31 लाख 18 हजार 609 रुपये आहे. अन्य पाच गुन्ह्याचा देखील तपास पूर्ण झाला असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक ईश्वर शिवसांब स्वामी यांनी यावेळी दिली. 

जिल्ह्यातील या 44 सायबर क्राईम पैकी 23 गुन्हे बॅन्क एटीएमशी संबंधीत आहेत. दरम्यान विविध बॅन्कांच्या एटीएम केबिन मध्ये एकापेक्षा अधिक एटीएम मशिन्स असणो वा एटीएम मशीन व खात्यात पैसे भरण्याचे मशीन असणो अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. एकावेळी केबिन मध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींनी असणो हे गुन्ह्याला निमंत्रण देणारे ठरु शकते. ही परिस्थिती बदलण्याकरीता सर्व बॅंकांना याबाबत तत्काळ कळविण्यात येईल असे स्वामी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कार्यशाळेत सायबर सुरक्षा, सिटीझन पोर्टल, मोबाईल अॅप विषयक माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

टॅग्स :RaigadरायगडCrimeगुन्हा