शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

निवडणुकीत जातीचा फॅक्टर ठरणार महत्त्वपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 04:57 IST

रायगड लोकसभा मतदारसंघ : मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारांना करावी लागणार कसरत

आविष्कार देसाई 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर सातत्याने प्रभावशाली ठरला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष विविध जातींना सोबत घेण्याचा नेहमीच प्रयत्न करताना दिसून येतात. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आगरी-मराठा-कुणबी या जातीचे प्राबल्य अधिक प्रमाणात आहे. त्याचबरोबर दलित आणि मुस्लीम अशी व्होट बँक आहे, त्यामुळे जातीनिहाय होणारे मतांचे विभाजन टाळण्यासाठी संबंधित उमेदवारांना कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येते.

रायगड लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. तटकरे हे गवळी समाजातून आलेले आहेत, तर गीते हे कुणबी समाजातून. तटकरे यांना विजयी करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे महाडमधील माजी आमदार माणिक जगताप, अलिबागमधील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी चंग बांधला आहे. जगताप हे मराठा आहेत, ठाकूर आणि पाटील हे आगरी समाजाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कोळी समाजाच्या सुमन कोळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.

मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्र्णयानंतर न्यायालयात सादर केलेल्या अहवालात तो समाज कुणबी असल्याचा तपशील देण्यात आल्याने कुणबी मतदारांत अस्वस्थता आहे. त्याचवेळी धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे आदिवासींत नाराजी आहे. शिवाय आपल्याला आरक्षण न मिळाल्याने धनगर समाजात नाराजी आहे. मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी मान्य न झाल्याने त्या समाजातील बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. आगरी-कोळी समाजालाही अपेक्षित सोयी-सुविधा न मिळाल्याने त्या समाजातही नाराजी आहे. भूमिपुत्र असून डावलले जात असल्याची भावना त्या समाजात तीव्र आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसraigad-pcरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक