शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 03:27 IST

बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या प्रवाहाची दिशाही बदलली; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत कर्जत-कल्याण राज्यमार्गाची दुरवस्था पाहता हा राज्यमार्ग आहे का?असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.राज्यमार्गाला मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा विळखा पडला आहे आणि आता तर बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरील मोºया बंद करून पाण्याच्या प्रवाहाची दिशाच बदलली आहे. याकडे बांधकाम विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कर्जत ते वांगणी (डोणे) हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. २० कि.मी.चा रस्ता पार करण्यासाठी चालकांना एक तासाहून अधिक वेळ लागतो. आता तर बांधकाम व्यावसायिकांनी अडथळा ठरणाºया रस्त्यालगतच्या काही मोºयाच बंद केल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. बांधकामामध्ये प्रवाह आड येत असल्याने व्यावसायिकांनी या ठिकाणी नैसर्गिक प्रवाहाची दिशाच बदलली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीमुळे पावसाचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहत आहे. यामुळे रस्त्यालगतची माती वाहून गेली आहे आणि रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी महामार्गालगतच्या मोºया पूर्ववत कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आठवडाभरापूर्वी याच मार्गावर डिकसळ येथील एका हॉस्पिटलच्या मालकाने अनधिकृत बांधकाम करत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला. त्यामुळे सर्व पाणी या राज्य मार्गावर वाहत होते. या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डा पडून दुर्घटना होण्याची तसेच रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.अतिक्रमणाची कारणेबिल्डरांना स्थानिक पुढारी, ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला आणि असेसमेंट उतारा दिला जातो, महावितरण वीजजोडणी देते आणि अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना अभय मिळते. एकमेकांचे साटेलोट्याने अतिक्रमणे उभी राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ज्या बिल्डरांनी रस्त्याच्या कडेला मातीचा भराव केला आहे, त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत; परंतु हे बिल्डर मनमानी करतात. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी अरेरावी करतात. या प्रकाराकडे स्थानिक तलाठी आणि तहसीलदार यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. मागील आठवड्यात डिकसळ येथील अतिक्र मण पोलीस बंदोबस्त घेऊन काढले आहे. तसेच ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात महावितरणला कळविले आहे.- अजयकुमार सर्वगोड, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागमाणगावच्या टेकडीवरून येणारे पाणी कर्जत-कल्याण राज्यमार्गाला असणाºया मोºयांमधून वाहून जात होते; परंतु बिल्डरने या मोºया बंद केल्याने मार्ग खचला आहे. बांधकाम विभागाने अशा बिल्डरवर कारवाई करावी, अन्यथा राज्यमार्ग खचेल.- सावळाराम जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Karjatकर्जतroad safetyरस्ते सुरक्षा