शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 03:27 IST

बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याच्या प्रवाहाची दिशाही बदलली; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत कर्जत-कल्याण राज्यमार्गाची दुरवस्था पाहता हा राज्यमार्ग आहे का?असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.राज्यमार्गाला मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा विळखा पडला आहे आणि आता तर बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरील मोºया बंद करून पाण्याच्या प्रवाहाची दिशाच बदलली आहे. याकडे बांधकाम विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने कर्जत-कल्याण राज्यमार्ग खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कर्जत ते वांगणी (डोणे) हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. २० कि.मी.चा रस्ता पार करण्यासाठी चालकांना एक तासाहून अधिक वेळ लागतो. आता तर बांधकाम व्यावसायिकांनी अडथळा ठरणाºया रस्त्यालगतच्या काही मोºयाच बंद केल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. बांधकामामध्ये प्रवाह आड येत असल्याने व्यावसायिकांनी या ठिकाणी नैसर्गिक प्रवाहाची दिशाच बदलली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीमुळे पावसाचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहत आहे. यामुळे रस्त्यालगतची माती वाहून गेली आहे आणि रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी महामार्गालगतच्या मोºया पूर्ववत कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आठवडाभरापूर्वी याच मार्गावर डिकसळ येथील एका हॉस्पिटलच्या मालकाने अनधिकृत बांधकाम करत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला. त्यामुळे सर्व पाणी या राज्य मार्गावर वाहत होते. या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डा पडून दुर्घटना होण्याची तसेच रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.अतिक्रमणाची कारणेबिल्डरांना स्थानिक पुढारी, ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला आणि असेसमेंट उतारा दिला जातो, महावितरण वीजजोडणी देते आणि अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना अभय मिळते. एकमेकांचे साटेलोट्याने अतिक्रमणे उभी राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ज्या बिल्डरांनी रस्त्याच्या कडेला मातीचा भराव केला आहे, त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत; परंतु हे बिल्डर मनमानी करतात. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी अरेरावी करतात. या प्रकाराकडे स्थानिक तलाठी आणि तहसीलदार यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. मागील आठवड्यात डिकसळ येथील अतिक्र मण पोलीस बंदोबस्त घेऊन काढले आहे. तसेच ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात महावितरणला कळविले आहे.- अजयकुमार सर्वगोड, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागमाणगावच्या टेकडीवरून येणारे पाणी कर्जत-कल्याण राज्यमार्गाला असणाºया मोºयांमधून वाहून जात होते; परंतु बिल्डरने या मोºया बंद केल्याने मार्ग खचला आहे. बांधकाम विभागाने अशा बिल्डरवर कारवाई करावी, अन्यथा राज्यमार्ग खचेल.- सावळाराम जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Karjatकर्जतroad safetyरस्ते सुरक्षा