बाळगंगा प्रकल्पाचा अंतिम निवाडा रद्दबातल करा
By Admin | Updated: August 26, 2015 00:07 IST2015-08-26T00:07:27+5:302015-08-26T00:07:27+5:30
बाळगंगा धरण प्रकल्पाच्या अंतिम निवाड्यात असंख्य त्रुटी असल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या या निवाड्यातून हाती काहीच लागले नाही. संकलनात प्रत्यक्षात असलेली ३,४४३ कुटुंबांपैकी

बाळगंगा प्रकल्पाचा अंतिम निवाडा रद्दबातल करा
पेण : बाळगंगा धरण प्रकल्पाच्या अंतिम निवाड्यात असंख्य त्रुटी असल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या या निवाड्यातून हाती काहीच लागले नाही. संकलनात प्रत्यक्षात असलेली ३,४४३ कुटुंबांपैकी २,२१२ कुटुंबांची नोंदी आल्या आहेत. उर्वरित १,१९७ कुटुंबांच्या नोंदीच नसल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पदरी काय पडले, या निराशेच्या समस्येने ग्रासलेल्या बाधित कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संतप्त बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी शासनाच्या उच्चस्तरीय अधिकारीवर्गाला फैलावर घेऊन आपल्या संतप्त भावना प्रकट केल्या.
बाळगंगेचा अंतिम निवाडा चुकीचा असून तो रद्दबातल करून नव्याने संकलन नोंदी करण्याची आग्रही मागणी चार तास चाललेल्या वादळी बैठकीत वरसई वैजनाथ मंदिरात केली आहे. त्यामुळे बाळगंगा धरण प्रकल्प पाणी पुन्हा पेटणार असून येत्या ७ सप्टेंबरपर्यंत व्यापक आंदोलन करण्याच इशारा आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत दिला आहे. बाळगंगा धरण पाणीप्रश्न भविष्यात पेटणार असून उभ्या राहणाऱ्या नवीन वसाहती पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरात व्यापारी तत्त्वावर होणार आहे. धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम बाकी आहे. मात्र धरण पूर्णत्वास येत असताना बाळगंगा प्रकल्पग्रस्त उघड्यावरच आहेत.
अंतिम निवाड्यात १३ गावे, ९ वाड्यांवरची प्रकल्पग्रस्तांची संसाधने, झाडे, जमीन, घरे यांच्या नोंदीच निवाड्यात न आल्याने बाळगंगा प्रक ल्पग्रस्त न घरका न घाटका अशा केविलवाण्या अवस्थेत आहेत. जमिनीला अल्प मोबदला, घरांचे मूल्यांकन नाही व १९९७ कुटुंबांशिवाय शेतमजूर, भूमीहिन, आदिवासीच्या वनजमिनी, झाडे, मंदिर, समाजमंदिर, शाळा, विहिरी, इतर पाणवठे, यांच्या नोंदीबाबत अक्षम्य चुका व उलटसुलट नोंदी पडल्याने प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत. जाहीर झालेला अंतिम निवाडा रद्द करून नव्याने संकलन करा, अशी वादळी चर्चा सभेमध्ये झाली. संसाधनाच्या नोंदीसाठी नव्याने प्रयत्न करून हा निवाडाच रद्दबातल करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.