शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

वाढलेल्या मतदार संख्येच्या फायद्याची गणिते, सुनील तटकरे यांनी राबविलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा फायदा होणार का? 

By राजेश भोस्तेकर | Updated: May 22, 2024 16:02 IST

तटकरे यांच्यासोबत भाजप आणि शिंदे सेना, मनसे आणि मित्र पक्ष यांचे पाठबळ होते. तर गीते यांच्यामागे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्ष आहेत.

अलिबाग :  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. गतवेळीपेक्षा १ टक्क्याने मतदानाचा टक्का घसरला असला तरी वाढलेल्या मतदार संख्येमुळे त्याचा फायदा कोणाला होणार हे ४ जून रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अनंत गीते की सुनील तटकरे हीच चर्चा सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उद्धव सेनेचे  अनंत गीते यांच्यात खरी लढत झाली. वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांच्यासह दहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते; मात्र निवडणुकीत गीते आणि तटकरे यांचाच बोलबाला प्रचारात दिसत होता. तटकरे यांच्यासोबत भाजप आणि शिंदे सेना, मनसे आणि मित्र पक्ष यांचे पाठबळ होते. तर गीते यांच्यामागे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्ष आहेत. प्रचारात दोन्ही उमेदवारांनी विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून परस्पर विरोधी प्रचार करण्यात धन्यता मानली. दोन्ही पक्षात असलेली नाराजीनाट्य याचा परिणामही काहीसा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गीते यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, हुसेन दलवाई, नसीम खान यासह इतर मान्यवरांनी सभा घेतल्या. शेवटच्या टप्प्यात तर इंडिया आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र होते. सुनील तटकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, नाजिम मुल्ला, रुपाली चाकणकर,  रामदास आठवले  यांनी प्रचाराला हजेरी लावली. त्यामुळे रंगत वाढली.  रायगड लोकसभा मतदारसंघात ६०.५१ टक्के मतदान झाले आहे. १६ लाख ६८ हजार ३७२ मतदारांपैकी १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ६ लाख ५८ हजार ७६४ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६१.७७ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत १.२६ टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला आहे. असे असले तरी मतदारांची संख्या वाढलेली आहे, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे टक्का कमी झाला तरी वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जाणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

विधानसभानिहाय मतदानमतदार संघ     २०१९      २०२४पेण    १,९५,५६७    १,९५,६५३अलिबाग     १,८९,७५८    १,९८,२८५श्रीवर्धन     १,५२,६६४    १,५५,२५४महाड     १,६८,५८०     १,६३,६९६दापोली    १,७१,९०७    १,६०,७९८गुहागर    १,४१,७०९    १,३५,८७७एकूण    १०,२०,१८५    १०,०९,५६३ 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेalibaugअलिबागlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४