शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

उरण परिसरात भुरट्या चोऱ्या,वाढत्या घरफोड्या; चिरनेरमध्ये गावाच्या सुरक्षिततेसाठी युवकांच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 6:05 PM

उरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण : उरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसही या वाढत्या प्रकाराला आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याने गावकऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी चक्क युवकांची रात्रीची गस्ती पथके तयार केली आहेत.

उरण परिसरातील काही गावांमध्ये चोरी, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.चिरनेर गावाचाही यामध्ये समावेश आहे. भुरट्या चोऱ्या,घरफोड्यांच्या तक्रारीनंतरही पोलिस बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहेत. परिणामी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे स्वतःबरोबर गावाची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ गावातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सुरक्षिततेसाठी गावातील तरुणांचे रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी गस्ती पथके तयार केली आहेत.रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत गावातील नाके, गल्ली बोळात ही तरुणाच्या या पथकांनी गस्त घालत खडा पहारा देण्यास सुरुवात केली आहे.गस्तीचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.चिरनेर गावातील प्रमोद ठाकूर यांच्या बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच चोर पळून गेले.

मारुती म्हात्रे, कमलाकर केणी यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र घरातील माणसांनी प्रसंगावधान राखून गस्ती पथकाला मोबाईलद्वारे संपर्क केला.चोरट्यांना गस्त घालणाऱ्या युवकांची चाहूल लागताच चोरांनी काढता पाय घेतला. गस्त घालणाऱ्या तरुणांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र चोरांनी शेतातून आड मार्ग काढून चोर पसार झाले. त्यामुळे चोरांचा हा चोरीचा प्रयत्न असफल ठरला.दहा दिवसांपूर्वी कळंबुसरे गावातील हेमंत नाईक, चंद्रशेखर राऊत, वसंत राऊत तर चिरनेर येथील ठकुबाई ठाकूर यांच्यासह इतर बंद घरातील दरवाजांच्या कड्या -कोयंडे तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, व रोख रकमेवर मोठा डल्ला मारला आहे. तसेच याआधी विंधणे, जासई, चिर्ले, धुतुम, बोकडवीरा, नागाव या सारख्या गावात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्या आहेत. 

चोरट्यांकडे धारदार शस्त्र असून, चेहरा कापडांनी झाकून ठेवतात. या सराईत चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, चिरनेर परिसरात बंद असलेली काही घरे फोडून घरातील किमती ऐवज चोरून नेण्याचा धडाका लावला आहे.वाढत्या चोऱ्यांमुळे  ग्रामस्थ मात्र हैराण झाले आहेत.त्यांच्यात घबराट निर्माण झाल्याने विनाकारण जागावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांपेक्षाही अफवांचे पीक अधिक असल्याचेही काही ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.खबरदारीची उपाययोजना रात्रीच्या वेळी तरुणांची गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत.तसेच मुख्य आणि गावातील रस्त्यावरील दुकानदार आणि ज्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या सर्वांना सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दिशेने फिरवून घेण्याची  विनंती केली आहे.त्याचबरोबर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. ----भास्कर मोकल सरपंच : चिरनेर ग्रामपंचायत

 चिरनेर गावात ग्रामपंचायतीने बेकायदा फेरीवाल्यांना गावात फिरण्यास सक्त मनाई केली आहे. गावात परप्रांतीय भाडेकरुंचीही डोकेदुखी वाढली आहे. 

 सचिन घबाडीउपसरपंच:  ग्रामपंचायत चिरनेर

घटनांपेक्षाही अफवांचे पीक अधिक आहे.तरीही ग्रामपंचायत ,सरपंच यांच्याशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविली आहे. लवकरच चोरांचा बंदोबस्त केला जाईल.

सतीश निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक-- उरण