शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:41 IST

ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे दिसत असल्याचे विविध मान्यवरांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीतील पहिलाच अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे दिसत असल्याचे विविध मान्यवरांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे. शेतकरी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत विकास, रोजगार अशा सर्वच घटकांना स्पर्श करण्यात आला आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्याने महागाईचा भडका उडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. रिअल इस्टेटला उभारी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात पुढील दोन वर्षे एक टक्का सूट दिली आहे. त्यामुळे घर, फ्लॅट यांच्या किमती काही अंशी कमी होण्यास मदत मिळणार आहे.>सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट एक रुपयाने वाढवला आहे. त्यामुळे ते महाग होणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार असल्याने त्याचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तूंवर होणार असल्याने महागाई वाढण्यास हातभार लागणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागांचा विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे दिसून येते. परंतु सरकारकडे वित्तीय तूट असताना निधी कसा उभारणार, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.- विजय साळसकर, सीए>राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस-रेडी प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन विकासासाठी तब्बल एक हजार ४०० कोटी रुपयांचा निधी दण्यात येणार आहे. रोरो सेवा, जेट्टींचा विकास, मुरूड समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांच्या सुविधेसाठी आर्थिक तरतूद, डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत. शेतीसाठीही भरभरून दिले आहे.- आदिती तटकरे,पालकमंत्री, रायगडसमाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा असा समाधानकारक अर्थसंकल्प आज महाविकास आघाडीच्या सरकारने सादर केला आहे. अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यासोबत मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यांचे सुशोभीकरण, रेवस-रेडी सागरी मार्ग प्रकल्पासाठी तसेच कोकणाला लाभलेल्या चार भारतरत्नांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. ८० टक्के नोकºया स्थानिकांना देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याचसोबत शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, सुरक्षा व कृषीक्षेत्रासाठीही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारचे अभिनंदन.- सुनील तटकरे, खासदार>राज्यातील प्रत्येकाची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. सरकारने फक्त अर्थसंकल्पात केवळ घोषणाच केलेल्या आहेत. योजनांच्या निधीबाबत कोणतीच माहिती नाही. शेतकºयांना कर्जमाफी केली असली तरी, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. त्याबाबत काहीच नाही. तीन पक्षांचे असणारे सरकार टिकवायचे असल्यानेच जनतेला नुसतेच खूश करण्याचा प्रयत्न आहे.- प्रशांत ठाकूर,आमदार, भाजप>जागतिक मंदीच्या काळात महाविकास आघाडी सरकारने हा अत्यंत उल्लेखनीय असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. महिला सुरक्षिततेसाठी २१०० कोटींची तरतूद म्हणजे आई-बहिणीच्या अब्रू रक्षणासाठी उचललेलं पहिलं पाऊल. त्याचबरोबर ५००० कोटी आरोग्य सेवा, २२,००० कोटी शेतकरी कर्जमुक्ती योजना, हजार कोटी पर्यावरण विकासासाठी म्हणजेच सरकारने महिला सुरक्षा, गोरगरिबांचा निवारा स्वस्त होणे तसेच आरोग्यसेवा या गरजेच्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र बनवण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.- अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर, कायदेतज्ज्ञ, कळंबोली