शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

गोद नदीवरील पूल जीर्णावस्थेत, ब्रिटिशकालीन पूल कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:11 AM

झाडे वाढली : ब्रिटिशकालीन पूल कमकु वत

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावनजीक असलेला गोद नदीवरील कळमजे येथील पूल ब्रिटिशकालीन असून, त्याला शंभर वर्षे होऊन गेली आहेत. हा पूल जीर्ण झाला आहे. पुलावर मोठी झाडेझुडपे वाढल्याने त्याची मुळे भिंतीमध्ये जाऊन हा पूल कमकुवत झाला आहे, तसेच जुने दगडी बांधकाम असून, त्याची डागडुजी अद्यापही केलेली दिसत नाही. हा पूल जुना झाला असून, अवजड वाहतूक या पुलावरून सुरू आहे. यामुळे पूल हेलकावे खात असल्याचे कळमजे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक झाला असून, भविष्यात या पुलावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे, तसेच या नदी पुलाच्या बाजूने मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वे रुंदीकरणाचे काम चालू आहे. मातीचे मोठे भराव केल्याने अतिवृष्टी झाल्याने या नदी पुलाखाली जोरदार पाण्याच्या प्रवाह सुरू असून, या पुलाला मोठा धोका जाणवू लागला आहे. भविष्यात महाडमधील सावित्रीपूल दुर्घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गोद नदीचे येणारे पाणी हे पूर्णपणे या नदी पुलावर अडले जात असून, पुलाच्या स्प्रिंगिंग लेव्हलवर पातळी गेली, तर सुरक्षेच्या दृष्टीने या पुलावरील वाहतूक थांबविण्यात यावी, असे पत्र उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता महाड कार्यालय प्रमुख पी.पी.गायकवाड यांनी या पुलाबाबत माणगाव तहसीलदारांना २७ जुलै लेखी कळविले होते.तसेच यावेळी पत्राची दखल घेऊन माणगाव तहसील, माणगाव पोलीस यांनी पुलाची पाहणी केली होती. या पुलावर त्यांनी बंदोबस्तासाठी ताबादेखील घेतला होता, परंतु पाण्याची पातळी कमी झाल्याने या गोद नदीवरच्या पुलाची वाहतूक ही २७ जुलै दिवसरात्र चालू ठेवण्यात आली असली, तरी हा ब्रिटिशकालीन पूल मात्र भविष्यात धोकादायक होण्याआधीच संबंधित अधिकारी व प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड