शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वरला जाणारा पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:05 IST

दोन बस, चार कार अडकल्या : २०० पर्यटकांना खंडाळे-पवेळे करावी लागली पायपीट; भराव टाकून तात्पुरता रस्ता केला तयार

- आविष्कार देसाईअलिबाग : तालुक्यातील खंडाळे-पवेळे गावांना जोडणारा सुमारे ४० वर्षे जुना पूल रविवारी दुपारी पडला. त्यामुळे तब्बल एक हजार नागरिकांचा संपर्क तुटला होता, तर सुमारे २०० पर्यटक सिद्धेश्वरच्या डोंगरावर अडकून पडले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी पायी वाट करून पर्यटकांचा मार्ग सुकर केला. मात्र पर्यटकांच्या दोन बस आणि चार गाड्या पवेळे - सिद्धेश्वराच्या पायथ्याशी अद्यापही अडकल्या आहेत. सध्या पुलावर भराव टाकून तात्पुरता रस्ता उभारण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सागर पाठक यांनी दिली.पूल पडला तेव्हा पुलावर कोणीच नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पूल पडून चार तास झाले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी पोचले नव्हते.अलिबागपासून खंडाळे सुमारे पाच किमी आहे. खंडाळे स्टॉपपासून पवेळे गावात जाण्यासाठी फाटा आहे. त्याचमार्गावर हा जुना पूल आहे. गेल्या काही महिन्यांपासून याच पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जात होती. रविवारी सकाळी सुध्दा याच पुलावरून सिमेंटची अवजड वाहतूक सुरू होती. त्यावेळी गावातील तरुण जितेंद्र मळेकर यांनी संबंधित चालकाला पूल कमकुवत असल्याचे सांगितले, मात्र त्याने ऐकले नाही.सकाळी अकराच्या सुमारास पुलाला मोठी भेग पडली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान पूल खाली कोसळला. जवळच्या शेतामध्ये प्रतीक पाटील हा तरुण काम करत होता. त्याचवेळी गावात जाण्यासाठी सचिन बहीरोळकर त्याच पुलावरून जाणार होता. त्या आधीच पूल खाली कोसळला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी तातडीने याची माहिती गावातील नागरिकांना दिली. मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी चार तासांनंतर तेथे पोचलेला नव्हता. खंडाळेच्या सरपंच रंजना नाईक, उपसरपंच संतोष कनगुटकर, विजय पाटील, नाशिकेत कावजी यांनी पाहणी केली.पूल पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागालाही नव्हती. ‘लोकमत’ने याबाबतची माहिती दिल्यानंतर आपत्ती विभागाचे सागर पाठक यांनी तातडीने मदत पाठवण्यात येत असल्याचे सांगितले. सध्या पुलावर भराव टाकून तात्पुरता रस्ता उभारण्यात आला आहे.पवळे गावातील रुग्णांना अलिबाग, खंडाळेत जावे लागतेपवेळे गावाची लोकसंख्या सुमारे ८०० आहे. ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी याच पुलावरून ये-जा करावी लागते. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा आसरा होता. पूल पडल्यामुळे त्यांचा संपर्क तुटला आहे. पवळे गावामध्ये दवाखाना नाही. छोट्या-मोठ्या आजारावार उपचारासाठी त्यांना खंडाळे आणि अलिबाग याच ठिकाणी यावे लागते. गावामध्ये किराणा सामानाची दोनच छोटी दुकाने आहेत.सिद्धेश्वरच्या प्रसिद्ध मंदिराकडे जाण्यासाठी याच गावातील पुलावरून जावे लागते. रविवार असल्याने तेथे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. पूल पडल्यामुळे सुमारे २०० पर्यटकांना सिद्धेश्वराच्या पायथ्याशीच थांबावे लागले. ग्रामस्थांनी त्यांना पुलावरून जाण्यासाठी वाट करून दिली. परंतु त्यांच्या दोन बसेस, चार गाड्या आणि काही दुचाकी पायथ्याखालीच ठेवाव्या लागल्या. पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर तेथून वाहने सोडण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड