शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आसरेवाडी येथील पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:01 AM

दुरुस्तीची मागणी : गर्डर नसल्याने अपघाताचा धोका

मोहोपाडा : चौक आसरेवाडी हे गाव मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४ वरून सुमारे तीन किमी अंतरावर आहे. गेली चार वर्षे या गावात जाणाऱ्या रस्त्याबरोबर पूलही नादुरुस्त झाला आहे, याची गंभीर दखल शासकीय यंत्रणा घेत नसल्याने ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

आसरेवाडी हे गाव दुर्गम असून, या ठिकाणी खासगी वाहनांच्या व्यतिरिक्त कोणतेच वाहन जात नाही. गेली चार वर्षे या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांनी साम्राज्य निर्माण केले आहे. येथील नागरिक रोजगार करण्यासाठी बाहेर जात असतो, येथून वाहन चालवणे म्हणजे दिव्यच. बहुतेक मोलमजुरी करणारे कामगार सायकली किंवा दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसात या गावच्या नागरिकांनी स्वखर्चाने रस्त्याचे खड्डे भरले होते, हे खड्डे भरणेही त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या पलीकडील होते. या रस्त्यावर नदीला मोठा पूल आहे या पुलाची उंचीदेखील मोठी असून, या पुलाला तडे गेले आहेत. त्यातून त्याच्या गंज लागलेल्या सळ्या स्पष्टपणे दिसत आहेत. पुलावर मोठे खड्डे असून पुलाला एकही गर्डर नाही. या पुलावरून ग्रामस्थांबरोबर शेतकरी व त्यांची जनावरे जात असतात, विशेष म्हणजे, येथूनच शाळेतील लहान मुलांचा जीवघेणा प्रवास सुरू होतो.