शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रियकरासाठी आईनेच संपवले दोन्ही लेकरांना; पोलिसांनी लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:02 IST

गुन्हे अन्वेषण विभागाने लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : अलिबाग तालुक्यातील किहीम गावात दोन मुलांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.  विवाहबाह्य संबंधात मुलांचा अडसर होत असल्याने महिलेने पाेटच्या दाेन्ही मुलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.  याप्रकरणी शीतल पोले हिला अटक करण्यात आली आहे.  

मूळचे यवतमाळ (गाव बेलोरे, ता. पुसद) असलेले सदानंद पोले आणि शीतल पोले हे दाम्पत्य आरध्या पोळे (वय ६), सार्थक पोळे (वय ३) यांच्यासोबत किहीम गावात राहत होते. ३१ मार्च रोजी त्यांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी मांडवा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या मुलांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासादरम्यान, पोलिसांनी मुलांचे आई-वडील आणि प्रियकराला चौकशीला बोलावले. मुलाच्या आईने या घटनेची माहिती देताना त्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसी खाक्या  दाखवताच शीतलने खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे यांनी केली. 

...असा केला खून लग्नाआधी प्रियकर साईनाथ जाधवसोबत शीतल हिचे प्रेमसंबंध होते. तिच्या मर्जीविरोधात घरच्यांनी लग्न लावले होते. तरीही दोघे भेटत होते. यावरून पती - पत्नीमध्ये वाद होता. प्रियकर साईनाथ याच्याकडे तिला जायचे होते. मात्र, मुलांना तो स्वीकारणार नसल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे शीतल हिने आपले पहिले प्रेम मिळविण्यासाठी पोटच्या मुलांनाच संपवले. शीतल हिने दोन्ही मुलांना टॉवेलच्या सहाय्याने नाक - तोंड दाबून ठार मारले. याबाबत शीतल पोले हिच्याविरोधत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी