शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बोर्लीपंचतन परिसर ३६ दिवसांपासून अंधारात, महावितरणविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:48 AM

सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात ३६ दिवस वीजपुरवठा नाही. विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरणविरोधात थेट पोलीस स्टेशनच गाठले. दिघी सागरी पोलिसांनी मध्यस्थी करीत पोलीस, ग्रामस्थ व महावितरण यांच्यात गुरुवारी सकाळी समन्वय बैठक आयोजित केली होती. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे. परिणामी, कुठे अनुचित प्रकार घडू नये. या अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्यात तातडीची बैठक बोलावण्यात आली. या वेळी स्थानिक राजकीय नेते मंडळी व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख ग्रामस्थ यांची सभा घेण्यात आली. या वेळी सर्वांकडून समस्या मांडण्यात आल्या.गावोगावी नेमणूक असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. विद्युत खांब उभे करण्यासाठी प्रत्येक गावातून दोनशेहून अधिक ग्रामस्थांचे श्रमदान मिळत असताना अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होत नाही. म्हसळा, मेंदडी, गोंडघर येथे सबस्टेशन होणारी मुख्य वाहिनीची कामे होत असताना गावा अंतर्गत कामेरखडली आहेत. अनेक विद्युत खांब कोसळलेल्या स्थितीत असून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत.यामुळे विद्युत पुरवठा स्थिर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.महावितरणकडून अधिकची बिले आली. ती भरली नाहीत म्हणून वीज जोडणी तोडायला कुणी आले तर आम्ही कर्मचाºयांना ते करू देणार नाही, असा आक्रमक इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.‘आठ दिवसांत वीज येणार’निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. जवळपास सर्वच गावांना या आठ दिवसांत वीज सुरळीत मिळेल, अशी माहिती श्रीवर्धनचे उपअभियंते महेंद्र वाघपैजन यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणRaigadरायगड