शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मासळी मिळत नसल्याने बोटी किनारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:48 IST

पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारण २० मेनंतर मासेमारी होड्या किनाºयावर साकारल्या जायच्या.

संजय करडे ।मुरुड जंजिरा : कोकणला ७२० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. सुमारे अडीच लाख कुटुंब पारंपरिक मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, एलईडीचे नवे तंत्र वापरून मासेमारी सुरू करण्यात आल्याने पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारण २० मेनंतर मासेमारी होड्या किनाºयावर साकारल्या जायच्या. मात्र, यंदा मासळीच मिळत नसल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच होड्या किनाºयाला लागल्या आहेत. याबाबत मच्छीमार बांधवांशी संपर्क साधला असता, खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नाही. एलईडीमुळे मासळी जाळ्यात सापडत नसल्याने डिझेल व मजुरीचा खर्चसुद्धा निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी सांगितले की, मोठ्या होड्या खोल समुद्रात २० ते २५ दिवसांच्या आसपास मासेमारी करतात. अशा वेळी या होड्यांचा डिझेल व मजुरीवरील खर्च हा ७० हजारांच्या आसपास जातो; परंतु प्रत्यक्षात मासळी मात्र दहा हजारांचीही मिळत नाही. असे दोन-तीन वेळ झाल्यास होडीचा मालक आपोआप कर्जबाजारी होतो, खर्चसुद्धा निघत नसल्यानेच होड्या किनारी लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे मकू यांनी सांगितले.३५० बोटीमुरु ड तालुक्यात सुमारे ३५० बोटी कार्यरत असून याद्वारे समुद्रातून मासेमारी केली जाते. मोठ्या बोटींबरोबरच लहान बोटींची संख्याही अधिक आहे. पूर्वी मोठ्या होड्या किनाºयाला मे महिन्याच्या अखेरीला साकारल्या जात असत; परंतु खोल समुद्रात मासळी सापडत नसल्याने या होड्या एप्रिल महिन्यातच किनाºयाला लावण्याची नामुष्की मच्छीमारांवर आली आहे.रायगड जिल्ह्यात एलईडी तंत्राचा वापर करून मासेमारी करणाºया नऊ बोटी पकडल्या आहेत. तसेच तहसीलदारांकडे केसही दाखल करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या बोटींचा परवाना रद्द करणे, दंड आकारण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. कार्यालयाकडे पुरेशी यंत्र सामुग्री नसल्याने एलईडी बोटीवरील पकडलेला जनरेटर जप्त करण्यात आलेला नाही; परंतु एलईडी ब्लब ताब्यात घेण्यात आले आहेत.- अविनाश नाखवा,सहायक मत्सविकास आयुक्त

टॅग्स :fishermanमच्छीमार