शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कर्जत येथे भाजपचे चून-भाकर आंदोलन; पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्याने शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:07 AM

पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्याने शासनाचा निषेध

कर्जत : महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. आजपर्यंत तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत शासनाची मदत पोहोचली नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत तहसीलदार कार्यालयाबाहेर चुन्नाची डबी आणि भाकरी अधिकाऱ्यांना देण्याचे आगळेवेगळे आंदोलन केले.

कर्जत तालुक्यातील सरत्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाने अद्याप मदत केली नाही तर काही शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत, असा आरोप करीत १३ नोव्हेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे चुना आणि भाकरी हे सोबत आणून आंदोलन केले. 

भारतीय जनता पक्ष आणि भाजप किसान मोर्चा यांच्या माध्यमातून केलेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी मोठी गर्दी केली  होती. भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, आयोजक भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील  भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे  यांच्यासह आदी प्रमुख उपस्थित  होते.