शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'भूलथापा देत भाजप सत्तेवर आला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:00 IST

गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विसर मोदी सरकारला पडला आहे.

अलिबाग : भारतातील जनतेला भूलथापा मारून भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेसने देशासाठी काहीच केले नाही असे म्हणणाऱ्यांनी गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विसर मोदी सरकारला पडला आहे. त्यामुळे मोदींना असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची प्रचारसभा अलिबाग येथील समुद्रकिनारी पार पडली. त्या सभेत पवार बोलत होते. आज भारताने जी प्रगती केली आहे ती काही मोदी सरकारच्या पाच वर्षांत झालेली नाही, असे कोणी मानत असले तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. नोटाबंदी करून काळा पैसा परत काही आलाच नाही. अच्छे दिनची स्वप्न दाखवत सत्तेवर आले. जनता आता त्यांना जाब विचारत असल्याने मोदी सरकारची भाषा आता बदललेली आहे. अपयश लपवण्यासाठीच ते भारतातील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आता ते गांधी घराण्यावर निशाणा साधत आहेत, तसेच त्यांनी आता पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला असल्याची टीका पवार यांनी आपल्या खास शैलीत केली.शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दैनंदिन झाल्या आहेत. देशातील शेतीचे उत्पादन घटले आहे. सत्ता बहाल केल्यास शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करू, असे आश्वासन पवार यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुखांनी सहा महिने आधी एकटे लढण्याची भाषा केली. अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली. त्यांच्याबरोबरच त्यांनी आता गळाभेट केली असा सवाल त्यांनी करून उद्धव ठाकरे यांचा त्यांच्याच शब्दावर भूमिकेवर विश्वास नाही. सत्तेसाठी ते कोणतीही तडजोड करतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.‘मोदींच्या डोक्यात सत्तेची हवा’जनतेला मोठी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली. परंतु सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानपदाचा त्यांनी मान ठेवला नाही. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कर्जतमध्ये गुरुवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, काँग्रेसने देशासाठी फार काही केले आहे. इंदिरा गांधींनी देशाचा भूगोल बदलला. राजीव गांधींनी संगणक क्रांती घडविली. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्या हा देशासाठी त्याग नाही का? असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019