शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पेण येथील शहापाडा धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:08 IST

दोन दिवसाआड पाणीपुरवठा : खारेपाटातील २९ गावे ४३ वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट

- दत्ता म्हात्रे

पेण : नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी धावपळ करा, अशी पेण खारेपाटातील २९ गावे ४३ वाड्यांची स्थिती आहे. येथे नेहमीप्रमाणे पाणीटंचाईची गंभीर समस्या यावर्षीही कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. वाशी खारेपाट व वडखळ विभागातील मसद-शिर्डी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापाडा धरणाच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शहापाडा धरणात असून, यानंतर खारेपाटातील २९ गावे ४३ वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले असून, टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी देण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर्षी उन्हाचे चटके फेब्रवारीमध्येच जाणवू लागल्याने पाण्यासाठी प्रशासनाला काटेकोर नियोजन करून पावले टाकावी लागतील.

पेणच्या शहापाडा धरण्याची पाणीक्षमता कमी असल्याने जुलै ते फेब्रुवारी अशा नऊ महिन्यांत हे धरण तळ गाठते. यामध्ये महत्त्वाचा भाग असा की, पावसाचे चार महिने, हिवाळ्यातील तीन महिने वापराचे पाणी तलाव, विहिरीद्वारे मिळत असल्याने शहापाडा नऊ महिन्यांपर्यंत टिकाव धरते. आता वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता या धरणात हेटवणे धरणाचे पाणी आणण्याची ३० कोटी निधीची योजना असून तिचे काम सुरू आहे.

ठेकेदार कंपनीकडून केले जाणारे योजनेचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे, यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १५ फेबु्रवारीपर्यंत या योजनेचे पाणी वाशी खारेपाटातील सात ग्रामपंचायतींना मिळावे म्हणून हे काम सुरू करताना सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्ते व नेतेमंडळींनी गाजावाजा करून पोस्टरबाजी, बॅनर झळकावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. आता शहापाडा धरणात कालव्याद्वारे येणारे हेटवण्याचे पाणी घेतले जाते. मात्र, त्यातून खारेपाटाची तहान भागणार नाही.

मुळातच महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने या योजनेचे उत्तरदायित्व घेतल्याने टंचाईच्या झळा जेव्हा लागतील, तेव्हा पाण्यासाठी वणवण भटकणाºया महिलांच्या रोषाला या अधिकाºयांना यावर्षी सामोरे जावे लागेल. या वर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी येथील जनतेची धारणा होती. मात्र, ३० कोटी योजनेचे काम करणारा ठेकेदार पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने, यंदा ही पाणीटंचाईची समस्या पाठ सोडणार नसल्याचे चित्र खारेपाटात आहे.पाणीटंचाईसाठी पंचायत समितीला करावी लागणार उपाययोजनाच्शहापाडा धरण परिसरात या योजनेचे दोन जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे, येत्या पावसाळी हंगामापर्यंत ते पूर्ण होईल. त्याचबरोबर शहापाडा धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे, पाणीपुरवठा लाइनच्या विस्तारीकरणाचे कामे सुरू करण्यासाठी मात्र वेळ लागणार आहे. मेन पाणीपुरवठा योजनेच्या कामांची खोदाई व पाइप टाकण्यासाठी मे महिना उजाडणार आहे, त्याअनुषंगाने ३० कोटींच्या पाणी योजनेच पाणी यावर्षी टंचाई काळात उपलब्ध होणार नसल्याने मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात शहापाडा धरणाला घरघर लागणार आहे. या वर्षातही खारेपाटातील पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवणार आहेत, त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी मार्च प्रारंभापासून पेण पंचायत समिती प्रशासनाला करावी लागणार आहे.

टॅग्स :Damधरण