शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंच नसलेली शाळा ते भारताचे सरन्यायाधीश; सूर्य कांत यांचा प्रेरणादायी प्रवास; राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ
2
वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार
3
'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल! 
4
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
5
नांतवाला भेटायला गेला, कॅनडातून भारतीयाला हाकलवून दिले; मुलींचा छळ, जबरदस्तीने 'सेल्फी' घेणं पडलं महागात
6
तुमच्या घराचं स्वप्न साकार होणार! PM आवास योजना २०२५ ची नवीन यादी जाहीर; असे तपासा आपले नाव!
7
दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 
8
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
9
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
10
वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'
11
'शोले'तील 'गब्बर'चा मुलगा, राणी मुखर्जीचा पहिला हिरो; आता कुठे गायब आहे अभिनेता?
12
IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!
13
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
14
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
15
एक ट्रीप, २ देश...कमी खर्चात कसं करायचा 'डबल प्रवास'?; जाणून घ्या बजेटमधला परफेक्ट फॉर्म्युला
16
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
17
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
18
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
19
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
20
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील बँकांना पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:48 IST

स्टेट बँकेची कॅश भिजली; चार दिवस व्यवहार राहणार बंद

दासगाव : महाड तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आणि तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. पुराचे पाणी शहरात दाखल झाल्याने पुराच्या पाण्यात या बँका देखील सुटल्या नाहीत. महाडमधील राष्ट्रीयकृत बँका असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या दोन्ही बँकांची यंत्रणा पुराच्या पाण्यात भिजल्याने किमान चार दिवस या बँका बंद राहणार आहेत. यातील स्टेट बँक आॅफ इंडियाची किमान चार लाखांची कॅश भिजली गेली. बँक आॅफ इंडियाचे काही व्यवहार उद्या सुरू होतील, अशी माहिती दिली आहे.महाड शहरात पुराच्या पाण्याने काही ठिकाणी पाच फुटांची पातळी गाठली होती. यामुळे दुकाने, बैठी घरे, जुन्या इमारतीमधील पहिला मजला यामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. शहरातील पूर ओसरल्यानंतर अनेकांना पैशाची गरज भासते. मात्र, महाडमधील स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयकृत बँका पाण्याखाली आल्या होत्या. यामुळे दोन्ही बँकांचे व्यवहार ठप्प झाले. बँकांमधील कागदपत्रे, संगणकीय यंत्रणा, एटीएम, प्रिंटर आणि फर्निचर आदी साहित्य भिजले गेले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधील सर्व सामान बाधित झाले असून जवळपास ४ लाख कॅश भिजली, तर पंधरा लॉकर, संगणकीय यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे ही बँक आठवडाभर बंद राहण्याची शक्यता असल्याचे बँकेचे सर्व्हिस व्यवस्थापक महेंद्र कपडेकर यांनी सांगितले.बँक आॅफ इंडियामधील कर्मचाऱ्यांनी बँकेतील काही सामान पाणी भरण्यास सुरवात होताच सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरवात केली, यामुळे बँकेतील काही यंत्रणा सुरक्षित राहिली. बँकेत किमान तीन फूट पाणी पातळी होती. यामुळे फर्निचर आणि कागदपत्रे पाण्यात बुडाली. बँक दोन दिवसातच पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता बँक अधिकारी सतीश पाडावे यांनी दिली. याचबरोबर महाडमधील मुरली मनोहर सहकारी बँकेच्या शिवाजी चौक शाखा तसेच अण्णासाहेब सावंत महाड को-आॅप. अर्बन बँकेत देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.बँका सुरक्षित स्थळी कधी जाणार?महाडमध्ये पूर हा प्रतिवर्षाचा आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर शासनाने काही निर्देश दिले होते. महाडमधील शासकीय कार्यालये, बँका सुरक्षित स्थळी किंवा किमान पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करणे आवश्यक आहे. मात्र, आजतागायत याबाबत बँका निष्काळजी राहिल्या आहेत. गेली अनेक वर्षे या बँका एकाच ठिकाणी आहेत. ज्या भागात पूर येण्याची अधिक शक्यता आहे अशा ठिकाणी या बँका असल्याने या पुरात देखील या बँका पाण्याखाली गेल्या. अद्याप बँका सुरक्षित स्थळी नेण्याबाबत कोणताच निर्णय बँक प्रशासनाकडून घेण्यात आला नसल्याची माहिती दोन्ही बँक अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :bankबँकRainपाऊस