शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

आपत्ती आल्यास मदत कोणाकडे मागायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:51 IST

नागरिकांचा प्रश्न : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचा बोजवारा

अलिबाग : पावसाळा सुरू झाला की, सर्वांनाच आपत्तीची चिंता लागते. आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आपत्तीच्या कालावधीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्ष कार्यान्वित केलेला आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना फोन केला असता तो उचलला जात नव्हता. त्याचप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्षातील दूरध्वनीही नुसताच खणखणत होता. त्यामुळे जिल्ह्यावर आपत्ती आलीच तर मदत नेमकी कोणाकडे मागायची, असा प्रश्न आहे.

रायगड जिल्ह्याला आपत्तीचा इतिहास आहे. जांभुळपाडा येथे १९८९ साली पूर आल्याने सर्वत्रच हाहाकार उडाला होतो. शेकडो माणसे त्यामध्ये मारली गेली होती, तर अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदी पूल दुर्घटनेत सुमारे ३० नागरिकांना मृत्यूने कवटाळले होते. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने रासायनिक कंपन्यांचे जाळे आहे. या ठिकाणी सातत्याने छोटे-मोठे अपघात होतच असतात. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे असे दळणवळणाचे महत्त्वपूर्ण मार्ग जातात. या मार्गावर अपघात होत असतात. मुरुड येथे २३ विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. जिल्ह्यात साथीचे रोगही पसरत असतात. पावसाळ्यात आपत्तीचा धोका अधिक असल्याने जिल्हा नेहमीच अलर्टवर असतो.

आपत्तीच्या कालावधीत तातडीने मदत पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. याच कारणासाठी सरकारने जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग सुरू करून आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याची नेमणूक केली. सागर पाठक सध्या आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही स्थापन केलेला आहे. पावसाळ्यात हा कक्षही २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतो. रविवारी मोठ्या संख्येने अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये पर्यटक आले होते. आपत्तीचा विभाग हा २४ तास सजग असला पाहिजे. मात्र, रविवारी पाठक यांना त्यांच्या मोबाइलवर ४ वाजण्याच्या सुमारास फोन केला असता नुसतीच रिंग होत होती. पाठक यांचा फोन उचलला जात नव्हता. त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षातील दूरध्वनीदेखील नुसताच वाजत होता. त्यामुळे एखाद्याला मदत पाहिजे असल्यास ती कशी आणि कधी पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला.आपत्ती विभागामार्फत मॉकड्रिल घेतले जाते. त्यामध्ये खोटी आपत्ती आणून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, आरोग्य, अग्निशमन यंत्रणा किती वेळात पोहोचतात, याची माहिती घेतली जाते; परंतु रविवारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्षावरच आपत्ती आल्याचे दिसून आले.‘संकटात मदत करण्याची जबाबदारी सरकारची’आपत्तीही सांगून कधीच येत नाही, यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे असते. अशा कालावधीत नागरिकांना संकटात मदत करण्याची जबाबदारी सरकारची म्हणजेच प्रशासनाची आहे. त्यांच्याच विभागाची अशी अवस्था असेल तर नागरिकांनी आपत्तीच्या कालावधीत कोणाची मदत मागायची, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग