शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचं भाषण संपताच दुसऱ्याच क्षणी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:27 IST

या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पनवेल येथे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर टीका केली. त्याचसोबत इथं मी हिरवा झेंडा दाखवायला आलो. गेल्या १७ वर्षापासून हा महामार्ग रखडलाय त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करण्याचे आदेश राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिले. पनवेलमधील राज ठाकरेंचे भाषण संपताच दुसऱ्या क्षणी पेणजवळ मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर आंदोलन सुरू केले.

मनसेचे स्थानिक नेते जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी प्रतिकात्मक म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मनसेच्या आंदोलनामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. या आंदोलनाबाबत जितेंद्र पाटील म्हणाले की, रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही वृक्षारोपण करत आहोत. खड्ड्यांमुळे जो त्रास लोकांना होतोय त्यासाठी सरकार आणि ठेकेदारच जबाबदार आहेत. काही मिनिटांपूर्वी राज ठाकरेंनी भाषण केले. त्यात खड्ड्यांचा ज्वलंत प्रश्न पुढे आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी जिथे जिथे खड्डे असतील तिथे आम्ही वृक्ष लावणार आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते असा इशाराही मनसे नेते जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पनवेल इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर परखड भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग व्हावा ह्यासाठी माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, हे काम वेळेत होईल ह्यासाठी लक्ष ठेवा, काम करा. त्यासाठी आंदोलन करायची वेळ आली तर असं आंदोलन करा की सरकारला भविष्यात आपल्या आंदोलनाची आठवण आणि दहशत राहील. मुंबई गोवा रस्ता झाल्यावर पण कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे बघा. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाचं इतकं अद्भुत दान आपल्या पदरात पडलं आहे त्याचा नाश करू देऊ नका असा आदेशच कार्यकर्त्यांना दिला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे