शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
3
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
4
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
5
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
6
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
7
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
8
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
9
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
10
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
11
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
12
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
13
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
14
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
15
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
16
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
17
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
18
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
19
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
20
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचं भाषण संपताच दुसऱ्याच क्षणी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:27 IST

या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पनवेल येथे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर टीका केली. त्याचसोबत इथं मी हिरवा झेंडा दाखवायला आलो. गेल्या १७ वर्षापासून हा महामार्ग रखडलाय त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करण्याचे आदेश राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिले. पनवेलमधील राज ठाकरेंचे भाषण संपताच दुसऱ्या क्षणी पेणजवळ मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर आंदोलन सुरू केले.

मनसेचे स्थानिक नेते जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी प्रतिकात्मक म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मनसेच्या आंदोलनामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. या आंदोलनाबाबत जितेंद्र पाटील म्हणाले की, रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही वृक्षारोपण करत आहोत. खड्ड्यांमुळे जो त्रास लोकांना होतोय त्यासाठी सरकार आणि ठेकेदारच जबाबदार आहेत. काही मिनिटांपूर्वी राज ठाकरेंनी भाषण केले. त्यात खड्ड्यांचा ज्वलंत प्रश्न पुढे आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी जिथे जिथे खड्डे असतील तिथे आम्ही वृक्ष लावणार आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते असा इशाराही मनसे नेते जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पनवेल इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर परखड भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग व्हावा ह्यासाठी माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, हे काम वेळेत होईल ह्यासाठी लक्ष ठेवा, काम करा. त्यासाठी आंदोलन करायची वेळ आली तर असं आंदोलन करा की सरकारला भविष्यात आपल्या आंदोलनाची आठवण आणि दहशत राहील. मुंबई गोवा रस्ता झाल्यावर पण कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे बघा. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाचं इतकं अद्भुत दान आपल्या पदरात पडलं आहे त्याचा नाश करू देऊ नका असा आदेशच कार्यकर्त्यांना दिला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे