शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

राज ठाकरेंचं भाषण संपताच दुसऱ्याच क्षणी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:27 IST

या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पनवेल येथे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर टीका केली. त्याचसोबत इथं मी हिरवा झेंडा दाखवायला आलो. गेल्या १७ वर्षापासून हा महामार्ग रखडलाय त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करण्याचे आदेश राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिले. पनवेलमधील राज ठाकरेंचे भाषण संपताच दुसऱ्या क्षणी पेणजवळ मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर आंदोलन सुरू केले.

मनसेचे स्थानिक नेते जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी प्रतिकात्मक म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मनसेच्या आंदोलनामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. या आंदोलनाबाबत जितेंद्र पाटील म्हणाले की, रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही वृक्षारोपण करत आहोत. खड्ड्यांमुळे जो त्रास लोकांना होतोय त्यासाठी सरकार आणि ठेकेदारच जबाबदार आहेत. काही मिनिटांपूर्वी राज ठाकरेंनी भाषण केले. त्यात खड्ड्यांचा ज्वलंत प्रश्न पुढे आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी जिथे जिथे खड्डे असतील तिथे आम्ही वृक्ष लावणार आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते असा इशाराही मनसे नेते जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पनवेल इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर परखड भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग व्हावा ह्यासाठी माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, हे काम वेळेत होईल ह्यासाठी लक्ष ठेवा, काम करा. त्यासाठी आंदोलन करायची वेळ आली तर असं आंदोलन करा की सरकारला भविष्यात आपल्या आंदोलनाची आठवण आणि दहशत राहील. मुंबई गोवा रस्ता झाल्यावर पण कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे बघा. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाचं इतकं अद्भुत दान आपल्या पदरात पडलं आहे त्याचा नाश करू देऊ नका असा आदेशच कार्यकर्त्यांना दिला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे