शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

भातशेतीबरोबरच शेतकऱ्यांनी आंबा, भाजीपाला लागवड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:14 AM

रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा.

कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले.रायगड जिल्हा विकास मंडळ व अलिबाग तालुका आंबा बागायतदारांची सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने हाशिवरे येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकºयांनी प्रक्रिया उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही शेळके यांनी सांगितले. यावेळी कृषी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.मेळाच्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल होते. कोकणात आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहोराचे संवर्धन महत्त्वाचे आहे. कारण याचवेळी अनेक रोगांचे आक्रमण होते. ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व औषधांच्या फवारण्यासाठी कृषी अधिकाºयांचे व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदशर््न तसेच मान्यवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाºया निमखाºया पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढविणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे मोकल यांनी सांगितले.एपीएमसीमध्ये शेतकºयांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकणात प्रत्येक जिल्ह्यात विक्री केंद्र उभारणे, आंध्र व कर्नाटकच्या आंब्याचे आक्रमण रोखण्यासाठी कोकण हापूसचे ब्रँडिंग करणे, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. कोकण हापूसला यूएईबरोबरच आशिया खंडात देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेता सेंद्रिय आंबा व भाजीपाला उत्पादनावर भर द्यावा, असेही आवाहन केले.आंब्यावरील कीड रोगाचे नियंत्रण, औषध आंबा मोहोराचे संरक्षण, शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर कर्जत कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. अविनाश शिंदे यांनी तर सर्व प्रकारच्या अन्य व्यवसायावर तारापूर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. प्रकाश शिंगारे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Raigadरायगड