शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

शिहू भागातील शेती गेली वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 23:54 IST

पावसाचा फटका; शासनाने पंचनामा करण्याची मागणी

नागोठणे : सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील शिहू भागातील भातशेती वाहून गेली. शासनाने तातडीने शेतीचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिहू येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल आणि माजी सरपंच भास्कर म्हात्रे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. पावसाचा फटका शिहूसह चोळे, आटिवली, गांधे, मुंढाणी आणि बोरावाडी तसेच इतर आदिवासीवाड्यांमधील शेतकऱ्यांना बसला आहे.

मुसळधार पावसाने नाले पाण्याने भरून पाणी वेगाने वाहायला सुरुवात झाली व कापणी केलेली भातशेती, शेतातून वाहून गेली असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. साधारणत: ५०० ते ६०० एकर भातशेतीला त्याचा फटका बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शासनाने सर्व गावांमधील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

भातपीक धोक्यात

च्रेवदंडा : सोमवारी सायंकाळच्या पावसाने भातपीक पूर्णपणे धोक्यात आले असून अनेक शेते पाण्यांनी भरली आहेत; कापणी केलेले भातपीक हातातून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच पावसाने दमदार हजेरी लावली आणि नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पाऊस सुरूच असल्याने शेतकरी तर शेतावर फिरकण्याच्या मन:स्थितीत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस