शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

केंद्राकडून तोडा-फोडा नितीचा अवलंब - राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 5:50 AM

शेतकरी कामगार पक्षाचा झाला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये ज्या पद्धतीने  ‘तोडा-फोडा’ नितीचा अवलंब केला होता, तसाच प्रकार सध्या केंद्रात  सत्तेत बसलेल्यांकडून सुरू आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगारवर्गाला देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.  सत्ता उलथवण्यासाठी पुन्हा  स्वातंत्र्याचा दुसरा लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी  सर्व  पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत आम आदमी पक्षाचे मंत्री गोपाळ राय यांनी व्यक्त केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त  वडखळ (ता. पेण) येथे मंगळवारी राज्यस्तरीय मेळावा झाला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे - भाजप सरकारवर कडाडून टीका केली.  राजू शेट्टी म्हणाले, ‘ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागत असल्याने अस्तित्व टिकविण्यासाठी मनाला मुरड घालून अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. 

सिलिंदर दिले, दर आवाक्याबाहेरमहिलांना चुलीवर जेवण करावे लागते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कोटी ५९ लाख जणांना गॅस वाटप केले. मात्र, त्यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती वाढू लागल्याने एकही नवा सिलिंडर घेतलेला नाही, असे माहिती अधिकारात प्राप्त झाल्याचे राजू शेट्टी यांनी भाषणात सांगितले.