शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कर्जतमध्ये २० गावेविकासासाठी दत्तक; ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:54 PM

महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

कर्जत : ज्ञानदान व वैचारिक क्र ांतीद्वारे समाज परिवर्तन घडवणारे थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मदिनानिमित्त कर्जतमध्ये समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुरेश लाड व कर्जतमधील इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्र माची सुरु वात झाली. सर्वच मान्यवरांनी जीवनविद्या मिशनच्या उपक्र माचे मनापासून कौतुक केले.कार्यक्र मादरम्यान प्रल्हाद पै यांनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपले जीवन हे नशिबावर अवलंबून नसून ते आपल्याच हातात आहे. जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार करून योग्य दिशेने प्रयत्न केल्यास नक्कीच प्रगती होते. आपण एकटे यशस्वी न होता आपल्यासोबत इतरांना यशस्वी केल्याने नेमके काय होते हे देखील त्यांनी अनेक मार्मिक उदाहरणे देत पटवून दिले.महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत कर्जत तालुक्यामधील २० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कार्यक्र मादरम्यान संस्थेच्या या अभियानातून सहकार्य मिळविण्यासाठी कर्जतमधील वैजनाथ गावाने प्रथम पुढाकार घेतला. अभियानासाठी कर्जतमधील इतर गावांनी देखील असाच पुढाकार घेतल्यास लवकरच कर्जतचा संपूर्ण कायापालट होऊ शकेल अशी आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड