शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'अर्णब गाेस्वामी यांच्यावरील कारवाई हा सरकारचा सूड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 00:32 IST

Arnab Goswami : अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते.

रायगड : पुराेगामी महाराष्ट्राला लाजवणारा हा प्रकार आहे. सुडाच्या भावनेतून महाविकास आघाडी सरकार कसे काम करत आहे, हे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांना पाेलिसांनी केलेल्या अटकेवरून दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी बुधवारी अलिबाग येथे दिली.अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते.सरकाच्या विराेधात आवाज उठवणाऱ्यांच्या विराेधात हे सरकार पूर्ण जाेर लावून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. काेराेना, सुशांतसिंह राजपूत आणि पालघर येथील घडलेली घटना या विराेधात पुढे येणाऱ्यांना सरकार राेखत आहे, असा आराेप नार्वेकर यांनी केला. लाेकशाहीला लाजवणारा हा प्रकार असल्याने या घटनेचा निषेध करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केेले.दाेन वर्षांपूर्वीच हे प्रकरण बंद करण्यात आले हाेते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यावर कारवाई का करण्यात आली नाही, कारवाईसाठी दाेन वर्षे का वाट बघितली, असा सवालही त्यांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणाविराेधात पत्रकारांनी आवाज उठविण्यास सुरुवात केल्यानेच पाेलिसांमार्फत त्यांना लक्ष करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, असेही नार्वेकर यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश माेहिते उपस्थित हाेते.

न्यायालयाबाहेर मोठी गर्दीन्यायालयाबाहेर विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांची मोठी गर्दी होती. न्यायालयातून अर्णब गोस्वामींना वैद्यकीय तपासणी बाहेर आणल्यानंतर, पोलीस गाडीला इलेक्ट्रॉनिक पत्रकारांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीBJPभाजपा