शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघात; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:35 IST

कारचा चक्काचूर; नेरळ पोलीस ठाण्यात नोंद

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळजवळील आंबिवली गावाजवळ इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला. यात गाडीचा पूर्ण चक्काचूर होऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. चेतन सदानंद अहिर (२७) असे या युवकाचे नाव असून, तो नेरळजवळील आंबिवली येथे राहणारा आहे.

आपल्या मित्राला दवाखान्यात घेऊन जातो, असे सांगून चेतन ६ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडला होता. त्याच वेळी दुसऱ्या दिवशी आपल्या चुलत भावाचा साखरपुडा असल्याने घरातील लहान गाडी अपुरी पडेल, या विचाराने तो मित्राची एर्टिगा गाडी क्र. एमएच ४६ पी ७७८१ ही घेऊन रात्री घरच्या दिशेने निघाला. मात्र, घराच्या दोन किलोमीटर अगोदर कल्याण-कर्जत राज्यमार्गावर माणगावजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला.

गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली, त्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला होता. गुरुवारी रात्री घडलेल्या या अपघाताची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली त्यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने चेतनचा मृत्यू झाला, असे समजते. मात्र, हा अपघात कसा झाला. चेतनच्या गाडीला कोणी धडक दिली की, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूRaigadरायगडthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र