शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघात; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:35 IST

कारचा चक्काचूर; नेरळ पोलीस ठाण्यात नोंद

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळजवळील आंबिवली गावाजवळ इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला. यात गाडीचा पूर्ण चक्काचूर होऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. चेतन सदानंद अहिर (२७) असे या युवकाचे नाव असून, तो नेरळजवळील आंबिवली येथे राहणारा आहे.

आपल्या मित्राला दवाखान्यात घेऊन जातो, असे सांगून चेतन ६ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडला होता. त्याच वेळी दुसऱ्या दिवशी आपल्या चुलत भावाचा साखरपुडा असल्याने घरातील लहान गाडी अपुरी पडेल, या विचाराने तो मित्राची एर्टिगा गाडी क्र. एमएच ४६ पी ७७८१ ही घेऊन रात्री घरच्या दिशेने निघाला. मात्र, घराच्या दोन किलोमीटर अगोदर कल्याण-कर्जत राज्यमार्गावर माणगावजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला.

गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली, त्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला होता. गुरुवारी रात्री घडलेल्या या अपघाताची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली त्यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने चेतनचा मृत्यू झाला, असे समजते. मात्र, हा अपघात कसा झाला. चेतनच्या गाडीला कोणी धडक दिली की, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूRaigadरायगडthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र