शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
3
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
4
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
5
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
6
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
7
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
8
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
9
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
10
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
11
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
12
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
13
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
14
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
15
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
16
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
17
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
18
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
19
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!
20
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण

बलापमध्ये जोपासली जातेय ‘रीघवनी’ची ८० वर्षांहून जुनी परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:05 AM

सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत. कोकणात या प्रथेला गावपळण असे म्हणतात. याच तालुक्यातील राबगाव गावामध्ये देखील अशी रीघवनीची प्रथा होती, परंतु आता गावाची लोकसंख्या वाढल्याने त्यांनी ती प्रथा बंद केली. दर नऊ वर्षांनी येणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव गुराढोरासह सोडतात. गावाबाहेर वेशीवर शेतात तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या करून साधारण तीन दिवस राहतात. गावात पूर्णत: शुकशुकाट असतो.

ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी ७ वाजता बाहेर पडले आहेत. साधारण ३५झोपड्या बांधल्या आहेत. गावातील अंदाजे ३०० आबालवृद्ध व तरुण तेथे राहत आहेत. शनिवारी रात्री गावात प्रमुख लोक जाऊन मानपान आणि पारंपरिक विधी करणार आहेत. त्यानंतर रविवारी ५ मे रोजी सर्व गावकरी पुन्हा आपापल्या घरी जाणार आहेत. अशी ही जुनी प्रथा आजही जोपासली जात आहे. सध्याच्या तरुण पिढीला हा युक्तिवाद पटत नाही. तरीसुद्धा ते मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

या गावात उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. ते सांगतात की, तीन दिवस गाव मोकळे राहिल्यामुळे प्रदूषण, रोगराई अशा काही गोष्टी गावात असतील तर त्यांचा नायनाट होतो. लोक मोकळ्यावर जाऊन राहतात, तिथे त्यांना वेगळे शेजारी लाभतात. त्यातून एकी निर्माण होते. एक इव्हेंट म्हणून आता हे साजरे केले जाते. निमित्त जरी रीघवनीचे असले तरीसुद्धा जशी शहरांत माणसे आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस बाहेर जातात, तसेच येथील प्रजा बदल म्हणून गावाबाहेर जाऊन राहते. यात अंधश्रद्धा अजिबात नाही, तर एका पुरातन परंपरेचे काटेकोरपणे जतन करीत असल्याचे येथील ग्रामस्थ प्रमोद खरिवले यांनी सांगितले. पूर्वीच्या लोकांचा उद्देश हाच असेल की रोगराई, प्रदूषण यापासून गाव तीन दिवस मुक्त व्हावा आणि नंतर परत नव्या उत्साहाने शुद्ध हवेत येऊन राहावे.

आजही मोठ्या उत्साहाने ‘रीघवनी’ची ही परंपरा जपली जाते. ग्रामदैवत श्रीरामेश्वरावर येथील लोकांची नितांत श्रद्धा आहे. पूर्वी गावात साथीचे रोग आल्यावर त्या रोगांचे विषाणू-जीवाणू प्रसार होऊ नये म्हणून सर्व लोक गावाबाहेर यायचे. मात्र त्यानंतर याला भूतप्रेत ही अंधश्रद्धा जोडली गेली. मात्र आम्ही तरुणांनी या परंपरेचे कारण पूर्वीचे साथीचे रोग असल्याचे शोधले आहे. या पाठीमागे कोणती भीती किंवा अंधश्रद्धा किंवा अघोरी प्रथा नाही. - किशोर खरीवले, उपसरपंच, बलाप

टॅग्स :Raigadरायगडsindhudurgसिंधुदुर्ग