शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सात हजार रुग्णांना घरातच ‘उपचाराचा डाेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:17 IST

जिल्ह्यात बेड मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाइकांची ससेहाेलपट : अपयश लपविल्याचा प्रशासनावर आरोप 

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा आलेख झपाट्याने उसळी घेत आहे. बहुतांश सरकारी आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. बेड मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे चांगलेच हाल हाेत आहेत. सद्य:स्थितीत सुमारे सात हजार काेराेना रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. प्रशासन आपले अपयश लपविण्यासाठीच रुग्णांवर घरी उपचार करत आहे, असा सर्रास आराेप केला जात आहे.काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सर्वांचीच झाेप उडाली आहे. जिल्ह्यात दिवसाला किमान बाराशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील चार लाख ७५ हजार ४६७ नागरिकांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. पैकी तीन लाख ९४ हजार ४६५ जणांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर ८७ हजार ६८४ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. ३२७ नागरिकांचे रिपाेर्ट अद्यापही प्रलंबित आहेत. सध्या सुमारे साडेनऊ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातत्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येपुढे आराेग्य व्यवस्थेचे हात ताेकडे पडत आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड हाऊसफुल्ल झाले आहेत. बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची ससेहाेलपट हाेत आहे. रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याने आता काय करायचे, असा सवाल रुग्णांसह त्याच्या नातेवाइकांना पडला आहे. उपचार मिळावेत यासाठी सरकार आणि प्रशासन काेणते प्रयत्न करत आहेत, असा संतप्त सवालही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक नसल्याने घरीच उपचार घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील तब्बल सात हजार रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. आराेग्य यंत्रणा आपले अपयश लपविण्यासाठी रुग्णच घरी उपचाराला पसंती देत असल्याचे सांगत असावेत, असे आसूडही रुग्णांचे नातेवाईक ओढत आहेत.जिल्हा सरकारी रुग्णालयातील आयसीयू सुद्ध फुल्ल झाले आहे. जिजामाता येथील बेडसाठी मारामारी हाेत आहे. सरकार आणि प्रशासन आराेग्य यंत्रणा सुधारण्यासाठी काेणते प्रयत्न करत आहे याबाबत सर्वच आलबेल असल्याचे दिसून येते. पनवेल तालुक्यातील आठ, कर्जत आणि खालापूर येथील प्रत्येकी दाेन, अलिबाग, पेण, माणगाव, महाड येथील प्रत्येकी एक अशी एकूण १६ खासगी रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. घरी उपचार घेणाऱ्यांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे दिली जात आहेत. त्यांना अधिक त्रास जाणवल्यास संबंधित डाॅक्टरांना ते फाेनल्रूरुन सल्ला घेत आहेत. तब्बल ८५ टक्के लक्षण नसलेले आणि साेम्य लक्षणे असलेले रुग्ण सात ते आठ दिवसांमध्ये बरे हाेत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. आम्ही त्यांना सल्ला देताे; मात्र ते घरीच विलगीकरणात राहण्याला पसंती देतात.यंत्रणेची दमछाकरुग्णसंख्या वाढत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना तातडीने सुट्टी देऊन रिकामा झालेला बेड नवीन भरती हाेणाऱ्या रुग्णांना दिला जात आहे. मात्र, बेड देताना आराेग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक हाेत आहे.

प्रशासन त्यांच्यावर काेणताही दबाव टाकत नाही. रुग्णांवर देखरेख ठेवण्यात येते तसेच अधिक त्रास झाल्यास त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांचे फाेन नंबर त्यांना दिलेले असतात.- डाॅ. सुधाकर माेरे, जिल्हा आराेग्य अधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस