शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

रायगड जिल्ह्यात ५४० गावे, १४९३ वाड्यांत जलदुर्भिक्ष, २०७ गावे-वाड्यांत २३ टँकर्सने पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:35 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ४८ गावे व १५९ वाड्या अशा एकूण २०७ गावे-वाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ४८ गावे व १५९ वाड्या अशा एकूण २०७ गावे-वाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात १५८ गावांसाठी १९ टँकर्स सुरू होते. आता त्यात ४ टँकर्सची भर पडली आहे. मागणीनुसार टँकर्सची संख्या वाढविण्यात येणार आहे.उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २०३३ गाव-वाड्यांतील ४९ हजार ८५५ ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता ९ कोटी ४० लाखांचा पाणीटंचाई निवारण कार्यक्र म अमलात आणण्यात आला आहे.रायगड जिल्हा परिषदेचे सर्व तालुका गट विकास अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या संदर्भात सुरू असलेल्या कामांचा आढावा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सोमवारी घेतला.जिल्ह्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरु वात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत गावे -वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तत्काळ झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित पूर्ण करण्याचे आदेश हळदे यांनी यावेळी दिले आहेत.गटविकास अधिकारी तसेच सहायक विस्तार अधिकारी यांनी, आपापल्या भागात सातत्याने पाणीटंचाईबाबत आढावा घेतराहावे, तसेच वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा व त्यानुसार उपाययोजना करावी. उप विभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्याशी समन्वय ठेवावा, असेही हळदे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी देखील बैठकीत मार्गदर्शन केले.३१ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीस१ कोटी २ लाखांचा निधी प्रस्तावितजिल्ह्यातील १७ गावे आणि १४ वाड्या अशा एकूण ३१ ठिकाणच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीकरिता १ कोटी २ लाख ८२ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. माणगाव तालुक्यातील दोन दुरुस्ती प्रस्ताव मंजूर झाले असून कार्यादेशाची प्रक्रिया सुरूआहे. महाड तालुक्यातील दोन दुरुस्ती प्रस्ताव मिंजुरीकरिता आले आहेत. तर पोलादपूर व कर्जतमध्ये प्रत्येकी एक प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहेत.रायगड उन्हाळी पाणीटंचाई निवारणनिधी मागणी३ कोटी३५ लाखप्राप्त निधी३ कोटी२ लाख३७ विंधण विहिरींची दुरुस्ती : जिल्ह्यातील ५७ गावे आणि १०६ वाड्या अशा एकूण १६३ ठिकाणच्या विंधण विहिरींची दुरुस्ती करण्याकरिता ४१ लाख ८२ हजारांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी ४२ गावे व ४९ वाड्यांमध्ये एकूण ९१ ठिकाणच्या विंधण विहिरींच्या दुरुस्तीस मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २१ गावे व १६ वाड्या अशा एकूण ३७ ठिकाणच्या विंधण विहिरींची दुरुस्ती करण्यात आली आहे.९० गावे व १० वाड्यांत २९ नवीन विंधण विहिरीआॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यात विंधण विहिरींची कामे सुरू आहे. जिल्ह्यातील १३० गावे व ४४२ वाड्या अशा एकूण ५७२ ठिकाणी विंधण विहिरी घेण्याकरिता ३ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित आहे. ५२ गावे आणि १८७ वाड्या अशा एकूण २२७ नवीन विंधण विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ९० गावे व १० वाड्यांमध्ये ३९ ठिकाणी विंधण विहिरी पूर्ण करण्यात आल्या, त्यापैकी २९ विंधण विहिरी यशस्वी झाल्या आहेत. सर्वाधिक विंधण विहिरी महाड, पोलादपूर, पेण या तीन तालुक्यात आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडwater scarcityपाणी टंचाई