शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

३५६ मशालींच्या प्रकाशात उजळला प्रतापगड

By admin | Updated: October 7, 2016 05:31 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्र माने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर बुधवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला ३५६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्र माने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर बुधवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला ३५६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य३५६ मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्र माचे आयोजन प्रतापगडचे भूमिपुत्र आप्पा उतेकर यांनी के ले होते. हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त प्रतापगडावर उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात स्वराज्य ढोल पथकाच्या ठेक्यावर झाली. सुमारे दोन तास लयबद्ध स्वरात चाललेले ढोल ताशा समूह वादन ऐकून अवघा शिवभक्त मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरातून दीप प्रज्वलित करून मशाली प्रकाशमान केल्या. यावेळी आप्पा उतेकर यांच्यासह राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, संतोष जाधव, नीलेश अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मशाली घेवून मावळे शिवप्रताप बुरुजाकडे सरसावले, संपूर्ण तटबंदीला लावलेल्या मशाली पेटविण्यात आल्या. गडाने जरी धुक्याची चादर पांघरली असली तरी ३५६ मशालीच्या उजेडात संपूर्ण प्रतापगड उजळून निघाला. किल्ले प्रतापगडावरील जगदंबेच्या मंदिरास २०१० साली ३५० वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधून या मशाल महोत्सवाची सुरु वात छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ही संकल्पना शिवभक्त आप्पा उतेकर यांची होती. यंदा या कार्यक्र माचे सातवे वर्ष. गडावर पावसाचे सावट असूनही असंख्य शिवभक्तांनी गर्दी केली होती.