शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात, किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 06:26 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील सुराज्य निर्माण केले जाईल : एकनाथ शिंदे 

महाड : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर शुक्रवारी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा झाला. शासनाच्या वतीने गेल्या महिनाभर या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. सनई-चौघड्याचे मंगलमय सूर, ढोलताशांचा गजर आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात हा सोहळा झाला. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर आपला शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी केला. या शिवराज्याभिषेकाचा वर्धापन दिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. यावर्षी या सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. रायगडावरील राजदरबारात असलेली मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजविण्यात आली होती. १ आणि २ जून असे दोन दिवस गडावर विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषात झाले. यामुळे रायगडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. 

गडावरील विविध देवी-देवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झाला. विकास गोगावले यांनी सपत्नीक शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून नंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेक केला. सूर्योदयावेळीचे आल्हाददायक वातावरण आणि शिवप्रेमींमधील अलोट उत्साह यामुळे रायगडावर वेगळेच उल्हसित वातावरण होते. शिवकालीन पारंपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, फडकणारे भगवे ध्वज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि ढोलताशे, तुतारींचे स्वर यांनी आसमंत दुमदुमून गेला होता. 

या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. सुनील तटकरे, खा. श्रीकांत शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आ. बच्चू कडू, आ. भरत गोगावले यांच्यासह खा. उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होताच संपूर्ण रायगडावर एकच जल्लोष झाला. ढोलताशांच्या गजरात हजारो शिवभक्तांनी फेर धरला. भगवे झेंडे, तलवारी, भाले आकाशाच्या दिशेने उंचावत शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सांस्कृतिक विभागामार्फत काढलेल्या शिवराय गॅझेटचे प्रकाशनदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय किल्ले रायगडावर काम करीत असलेल्या गाइड्सना खा. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या विमाकवचचे वितरण करण्यात आले. 

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पोलिस मानवंदना शिवराज्याभिषेक सुरू असतानाच अवकाशातून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी प्रथमच पोलिस मानवंदनादेखील देण्यात आली.

४० किलो चांदीची मूर्ती    या सोहळ्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ४० किलो चांदीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समितीकडे सुपुर्द करण्यात आली होती.    शिवराज्याभिषेक सोहळ्यात या ४० किलो मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तर पालखीदेखील सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आली.

मी जावळीचा मावळा गेल्या ११ महिन्यांत सरकारने घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. मी जावळीचा मावळा असल्याने शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कामकाज केले जाईल.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वधर्मसमभावाचा विचारछत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले साम्राज्य हे सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेले सुराज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार जतन केला पाहिजे, असे सांगत सध्या दोन धर्मांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जात असल्याबाबत खा. उदयनराजे भाेसले यांनी खेद व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज