शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

समाज माध्यमांमुळे रायगडमध्ये ३० टक्के घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 01:11 IST

कौटुंबिक कलहास मोबाइल कारणीभूत : धक्कादायक माहिती

- निखिल म्हात्रेअलिबाग : सध्याच्या युगात मोबाइल, इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. मात्र, सोशल मीडियामुळेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात समाज माध्यमाच्या वादातून ३० टक्के घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.समाज माध्यमांसारख्या गोष्टी स्वस्त आणि आवाक्यात आल्यानंतर वापरकर्ते अक्षरश: त्यांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे मोबाइल हेच आपले जग अशा मानसिकतेत असलेल्या नागरिकांमध्ये कौटुंबिक वाद वाढत चालले आहेत. अशाच वादातून ३० टक्के घटस्फोेट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरापासून दूर असताना कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी फायदेशीर ठरणारा मोबाइल अनेकांना कुटुंबापासून दूर नेत आहे. अनेक जणघरात कुटुंबासमवेत असताना तासन्तास मोबाइलवर घालविताना आढळून येतात. यामुळे घराच्यांसोबत आपुलकीचा संवादच होत नसल्याचे दिसून येते.व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे पती-पत्नींमध्येही दुरावा वाढत चालला आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण व्हॉट्स अ‍ॅपवरील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड, छायाचित्रे आदी पुरावे गोळा करेपर्यंत पोहोचते आणि त्यातूनच गंभीर गुन्ह्याची पातळी गाठली जाते. अशी अनेक प्रकरणे निवाड्यासाठी येत असतात. महिला आणि बालकल्याण विभागाच्या सखी विभाग व कौटुंबिक न्यायालयाद्वारे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे कौटुंबिक कलहात समेट करणे अत्यावश्यक होत असल्याचे महिला विभागाकडून सांगण्यात आले आहे.तरु ण दाम्पत्यांमध्ये संशयी वृत्ती वाढली आहे. याला समाज माध्यमांमुळे खतपाणी मिळत आहे. पती-पत्नीत वाद निर्माण होत आहेत. यात मोबाइलचा अति वापर हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मोबाइलचा अति वापर टाळण्यासाठी नव्या पिढीला समुपदेशन करणे गरजेचे आहे. - अ‍ॅड. निहा राऊतपती-पत्नीमधील विश्वासाचे नाते हरवत चालले आहे. मोबाइलच्या साहाय्याने एकमेकांविरोधात पुरावे शोधले जातात. समुपदेशानंतरही खदखद असते. कौटुंबिक कलहात ३० टक्के वादाला सध्या मोबाइल कारणीभूत आहे. हे वाद टाळण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे.- क्र ांती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक(अतिरिक्त कार्यभार महिला विभाग)

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाDivorceघटस्फोट