शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 14:47 IST

विषबाधा झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

- नितीन भावेखोपोली - वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कल्याणी शिंगोले (वय 7 वर्ष ), ऋषिकेश शिंदे (वय 12 वर्ष ) आणि प्रगती शिंदे ( वय 13 वर्ष) या तीन लहानग्यांचा विषबाधेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 ते 16 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पनवेलमधील एमजीएम, डीवाय पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफ लाईन, प्राची, उन्नती,  सायन या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना हलवण्यात आले आहे.  खालापूर तालुक्यातील देवन्हावे  येथील सुभाष रामचंद्र माने (माळी) यांनी महडच्या गावठाणमध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम सोमवार (18 जून) पार पडला. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवण तयार झाले. सर्व पदार्थ घरातच बनवण्यात आले होते.  दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली जेवणाची पंगत रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होती. साधारणता 250 जणांचे जेवण बनवण्यात आले होते. 

कार्यक्रम संपल्यानंतर अचानक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माने यांच्या पत्नी व मुलीला उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. यानंतर  महड, साजगाव, देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागली. परंतू, एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विष बाधा झाल्यानं सर्वांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ.रणजीत मोहिते यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांवर प्रथोमपचार केले व जे अत्यव्यस्थ  होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व रुग्णांवर उपचार करणं शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्तरित्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला.  

'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 'या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला, अन्यथा मृतांचा आकडा अजूनही वाढला असता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उरलेले जेवण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महड परिसरावर शोककळा पसरली आहे. 

पत्नीचा त्रास पाहिला, अन्...सध्या उपचार सुरू असलेल्यांमध्ये अनिता गायकवाड (वय 45 वर्ष) आणि निकिता गायकवाड (वय 17 वर्ष) या मायलेकींचाही समावेश आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनिता यांचे पती नवनाथ गायकवाड  यांनी पत्नी व मुलीला होत असलेला त्रास पाहून स्वतःहून उलट्या करुन खाललेले अन्न बाहेर काढले. त्यामुळे आपल्याला विषबाधेचा त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडfood poisoningअन्नातून विषबाधा