शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 14:47 IST

विषबाधा झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

- नितीन भावेखोपोली - वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कल्याणी शिंगोले (वय 7 वर्ष ), ऋषिकेश शिंदे (वय 12 वर्ष ) आणि प्रगती शिंदे ( वय 13 वर्ष) या तीन लहानग्यांचा विषबाधेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 ते 16 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पनवेलमधील एमजीएम, डीवाय पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफ लाईन, प्राची, उन्नती,  सायन या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना हलवण्यात आले आहे.  खालापूर तालुक्यातील देवन्हावे  येथील सुभाष रामचंद्र माने (माळी) यांनी महडच्या गावठाणमध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम सोमवार (18 जून) पार पडला. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवण तयार झाले. सर्व पदार्थ घरातच बनवण्यात आले होते.  दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली जेवणाची पंगत रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होती. साधारणता 250 जणांचे जेवण बनवण्यात आले होते. 

कार्यक्रम संपल्यानंतर अचानक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माने यांच्या पत्नी व मुलीला उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. यानंतर  महड, साजगाव, देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागली. परंतू, एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विष बाधा झाल्यानं सर्वांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ.रणजीत मोहिते यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांवर प्रथोमपचार केले व जे अत्यव्यस्थ  होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व रुग्णांवर उपचार करणं शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्तरित्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला.  

'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 'या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला, अन्यथा मृतांचा आकडा अजूनही वाढला असता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उरलेले जेवण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महड परिसरावर शोककळा पसरली आहे. 

पत्नीचा त्रास पाहिला, अन्...सध्या उपचार सुरू असलेल्यांमध्ये अनिता गायकवाड (वय 45 वर्ष) आणि निकिता गायकवाड (वय 17 वर्ष) या मायलेकींचाही समावेश आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनिता यांचे पती नवनाथ गायकवाड  यांनी पत्नी व मुलीला होत असलेला त्रास पाहून स्वतःहून उलट्या करुन खाललेले अन्न बाहेर काढले. त्यामुळे आपल्याला विषबाधेचा त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडfood poisoningअन्नातून विषबाधा