शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 14:47 IST

विषबाधा झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

- नितीन भावेखोपोली - वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कल्याणी शिंगोले (वय 7 वर्ष ), ऋषिकेश शिंदे (वय 12 वर्ष ) आणि प्रगती शिंदे ( वय 13 वर्ष) या तीन लहानग्यांचा विषबाधेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 ते 16 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पनवेलमधील एमजीएम, डीवाय पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफ लाईन, प्राची, उन्नती,  सायन या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना हलवण्यात आले आहे.  खालापूर तालुक्यातील देवन्हावे  येथील सुभाष रामचंद्र माने (माळी) यांनी महडच्या गावठाणमध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम सोमवार (18 जून) पार पडला. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवण तयार झाले. सर्व पदार्थ घरातच बनवण्यात आले होते.  दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली जेवणाची पंगत रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होती. साधारणता 250 जणांचे जेवण बनवण्यात आले होते. 

कार्यक्रम संपल्यानंतर अचानक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माने यांच्या पत्नी व मुलीला उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. यानंतर  महड, साजगाव, देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागली. परंतू, एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विष बाधा झाल्यानं सर्वांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ.रणजीत मोहिते यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांवर प्रथोमपचार केले व जे अत्यव्यस्थ  होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व रुग्णांवर उपचार करणं शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्तरित्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला.  

'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 'या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला, अन्यथा मृतांचा आकडा अजूनही वाढला असता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उरलेले जेवण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महड परिसरावर शोककळा पसरली आहे. 

पत्नीचा त्रास पाहिला, अन्...सध्या उपचार सुरू असलेल्यांमध्ये अनिता गायकवाड (वय 45 वर्ष) आणि निकिता गायकवाड (वय 17 वर्ष) या मायलेकींचाही समावेश आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनिता यांचे पती नवनाथ गायकवाड  यांनी पत्नी व मुलीला होत असलेला त्रास पाहून स्वतःहून उलट्या करुन खाललेले अन्न बाहेर काढले. त्यामुळे आपल्याला विषबाधेचा त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडfood poisoningअन्नातून विषबाधा