शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

अकरा गावांतील २७०० एकर शेतजमीन नापीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 1:13 AM

पेण तालुक्यातील गडब भागातील २४ शेतकऱ्यांनी हरित लवादाच्या नावाखाली शासनाला व ११ गावांतील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. माचेला-चिर्बी समुद्र संरक्षक बंधाºयाच्या दुरु स्तीला तसेच भगदाड (खांडी) बुजवण्यास मज्जाव केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : पेण तालुक्यातील गडब भागातील २४ शेतकऱ्यांनी हरित लवादाच्या नावाखाली शासनाला व ११ गावांतील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. माचेला-चिर्बी समुद्र संरक्षक बंधाºयाच्या दुरु स्तीला तसेच भगदाड (खांडी) बुजवण्यास मज्जाव केला आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांत ११ गावांतील २७०० एकर भातशेती जमीन खाºया पाण्याने नापीक झाली आहे. यावर शासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याच्या निषेधार्थ ११ गावांतील महिलांनी ‘आधी खांडी बांध, मगच मतदान करणार’ असा सामूहिक निर्धार करून लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कष्टकरी महिला आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या मंजुळा पाटील यांनी दिली आहे.होळी पौर्णिमेच्या दिवसापासून गेले तीन दिवस ११ गावांच्या भातशेतीत उधाणाचे पाणी शिरले आहे, त्यामुळे त्रासलेल्या महिलांनी शनिवारी देवळे गावात एकत्र येऊन बैठक घेतली आणि मतदानावर बहिष्काराचा सामूहिक निर्णय घेतला आहे. दरम्यान, गावांतील महिला कष्टकरी महिला आघाडी, अकरा गाव जमीन बचाव संघर्ष कृती समिती आणि खारडोंगर मेहनत आघाडी या तीन संघटनांच्या नेतृत्वाखाली येत्या मंगळवारी आनंदनगर, देवळी, जुई-अब्बास, खारपाले, मौजेपाले, म्हैसबाड, ढोंबी, जांभेळा, चिर्बी, माचेला, खारघाट या ११ गावांतील महिला पेण उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन या बाबतचे निवेदन देणार असल्याचे मंजुळा पाटील यांनी सांगितले.माचेला-चिर्बी येथे बंधाºयाला पडलेल्या भगदाडामुळे पहिल्या टप्प्यात १८०० एकर व त्यानंतर २३०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरून नुकसान झाले आहे. आता पुन्हा त्याच २३०० एकर क्षेत्रात होळी पौर्णिमेपासून रोज उधाणाचे पाणी शिरून शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या भातशेतीत छोटी कांदळवने निर्माण होत असून, या संदर्भात गेल्या दोन वर्षांत अनेक निवेदने दिली आहेत; परंतु शासनाकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही, शिवाय कोणतीही ठोस कार्यवाहीही झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.शासनाकडे कारवाईची मागणी१७ एप्रिल २०१९ पर्यंत बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली नाही, तर २७०० एकर बाधित झालेल्या जमीन कसणाºया सर्व गावांतील महिलांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय घेला आहे. अडवणूक करणाºया शेतकºयांवर शासनाने कारवाई करावी अथवा या २४ शेतकºयांवर २७०० एकराचा नुकसानभरपाईचा दावा टाकावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.२४ शेतकºयांचादुरुस्तीच्या कामात अडसरशेतकरी व महिलांनी गेल्या २३ मे २०१७ रोजी पेण प्रांत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले, तेव्हापासून विविध आंदोलने केली आहेत. आमदार धैर्यशील पाटील, पेण उप विभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसीलदार अजय पाटणे यांनी या बाधित शेतीची पाहणी केली आहे. मात्र, येथील २४ शेतकºयांनी हरित न्यायालयात याचिका दाखल करून संरक्षक बंधारे दुरुस्ती कामात अडसर निर्माण करून विरोध केला आहे.शेतकºयांनी केले काम बंदजिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २४ एप्रिल २०१८ रोजी संबंधित सर्व अधिकारी, जेएसडब्ल्यू कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीला माचेला-चिर्बी संरक्षक बंधारा (बाहेरकाठा) दुरु स्तीचे काम करण्याचे आदेश व त्याचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी खारभूमी विभागाकडे दिली.त्याप्रमाणे कंपनीने ७ मे ते ३ जून २०१८ पर्यंत ३०० मीटर लांबीच्या बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम केले. पावसाळ्यात हे काम बंद होते. पावसाळ्यानंतर खारभूमी विभागाने ३० डिसेंबर २०१८ रोजी पुन्हा काम सुरू केले असता, याच हरित न्यायालयात याचिका दाखल केलेल्या शेतकºयांनी हे काम बंद पाडले.शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत संरक्षक बंधारा दुरुस्तीचे काम करण्यास प्रारंभ होणार आहे. यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परिणामी, मतदानासारख्या पवित्र कार्यावर शेतकरी बांधवांनी बहिष्कार टाकू नये.- प्रतिमा पुदलवाड, उप विभागीय महसूल अधिकारी, पेण

टॅग्स :Raigadरायगड