शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अकरा गावांतील २७०० एकर शेतजमीन नापीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 01:14 IST

पेण तालुक्यातील गडब भागातील २४ शेतकऱ्यांनी हरित लवादाच्या नावाखाली शासनाला व ११ गावांतील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. माचेला-चिर्बी समुद्र संरक्षक बंधाºयाच्या दुरु स्तीला तसेच भगदाड (खांडी) बुजवण्यास मज्जाव केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : पेण तालुक्यातील गडब भागातील २४ शेतकऱ्यांनी हरित लवादाच्या नावाखाली शासनाला व ११ गावांतील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. माचेला-चिर्बी समुद्र संरक्षक बंधाºयाच्या दुरु स्तीला तसेच भगदाड (खांडी) बुजवण्यास मज्जाव केला आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांत ११ गावांतील २७०० एकर भातशेती जमीन खाºया पाण्याने नापीक झाली आहे. यावर शासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याच्या निषेधार्थ ११ गावांतील महिलांनी ‘आधी खांडी बांध, मगच मतदान करणार’ असा सामूहिक निर्धार करून लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कष्टकरी महिला आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या मंजुळा पाटील यांनी दिली आहे.होळी पौर्णिमेच्या दिवसापासून गेले तीन दिवस ११ गावांच्या भातशेतीत उधाणाचे पाणी शिरले आहे, त्यामुळे त्रासलेल्या महिलांनी शनिवारी देवळे गावात एकत्र येऊन बैठक घेतली आणि मतदानावर बहिष्काराचा सामूहिक निर्णय घेतला आहे. दरम्यान, गावांतील महिला कष्टकरी महिला आघाडी, अकरा गाव जमीन बचाव संघर्ष कृती समिती आणि खारडोंगर मेहनत आघाडी या तीन संघटनांच्या नेतृत्वाखाली येत्या मंगळवारी आनंदनगर, देवळी, जुई-अब्बास, खारपाले, मौजेपाले, म्हैसबाड, ढोंबी, जांभेळा, चिर्बी, माचेला, खारघाट या ११ गावांतील महिला पेण उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन या बाबतचे निवेदन देणार असल्याचे मंजुळा पाटील यांनी सांगितले.माचेला-चिर्बी येथे बंधाºयाला पडलेल्या भगदाडामुळे पहिल्या टप्प्यात १८०० एकर व त्यानंतर २३०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरून नुकसान झाले आहे. आता पुन्हा त्याच २३०० एकर क्षेत्रात होळी पौर्णिमेपासून रोज उधाणाचे पाणी शिरून शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या भातशेतीत छोटी कांदळवने निर्माण होत असून, या संदर्भात गेल्या दोन वर्षांत अनेक निवेदने दिली आहेत; परंतु शासनाकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही, शिवाय कोणतीही ठोस कार्यवाहीही झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.शासनाकडे कारवाईची मागणी१७ एप्रिल २०१९ पर्यंत बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली नाही, तर २७०० एकर बाधित झालेल्या जमीन कसणाºया सर्व गावांतील महिलांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय घेला आहे. अडवणूक करणाºया शेतकºयांवर शासनाने कारवाई करावी अथवा या २४ शेतकºयांवर २७०० एकराचा नुकसानभरपाईचा दावा टाकावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.२४ शेतकºयांचादुरुस्तीच्या कामात अडसरशेतकरी व महिलांनी गेल्या २३ मे २०१७ रोजी पेण प्रांत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले, तेव्हापासून विविध आंदोलने केली आहेत. आमदार धैर्यशील पाटील, पेण उप विभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसीलदार अजय पाटणे यांनी या बाधित शेतीची पाहणी केली आहे. मात्र, येथील २४ शेतकºयांनी हरित न्यायालयात याचिका दाखल करून संरक्षक बंधारे दुरुस्ती कामात अडसर निर्माण करून विरोध केला आहे.शेतकºयांनी केले काम बंदजिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २४ एप्रिल २०१८ रोजी संबंधित सर्व अधिकारी, जेएसडब्ल्यू कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीला माचेला-चिर्बी संरक्षक बंधारा (बाहेरकाठा) दुरु स्तीचे काम करण्याचे आदेश व त्याचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी खारभूमी विभागाकडे दिली.त्याप्रमाणे कंपनीने ७ मे ते ३ जून २०१८ पर्यंत ३०० मीटर लांबीच्या बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम केले. पावसाळ्यात हे काम बंद होते. पावसाळ्यानंतर खारभूमी विभागाने ३० डिसेंबर २०१८ रोजी पुन्हा काम सुरू केले असता, याच हरित न्यायालयात याचिका दाखल केलेल्या शेतकºयांनी हे काम बंद पाडले.शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत संरक्षक बंधारा दुरुस्तीचे काम करण्यास प्रारंभ होणार आहे. यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परिणामी, मतदानासारख्या पवित्र कार्यावर शेतकरी बांधवांनी बहिष्कार टाकू नये.- प्रतिमा पुदलवाड, उप विभागीय महसूल अधिकारी, पेण

टॅग्स :Raigadरायगड