शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 3:03 AM

जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १४६ सरपंचपदांसाठी ३९१ उमेदवार, तर ९९८ सदस्यपदांच्या जागांसाठी २,१९१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

अलिबाग : जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १४६ सरपंचपदांसाठी ३९१ उमेदवार, तर ९९८ सदस्यपदांच्या जागांसाठी २,१९१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत ३९ ग्रामपंचायतींमध्ये ५५३ सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. येत्या २७ मे रोजी जिल्ह्यातील विविध ५२६ केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागातील सत्ता आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच जोर आला आहे. अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणाºया १५ जागा आहेत, त्यासाठी ४७ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. सदस्यपदासाठी १५३ जागांसाठी ३४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढविणार आहेत.पेणमध्ये सरपंचपदासाठी सात जागा आहेत. त्यासाठी २३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत, तर सदस्यपदाच्या ६८ जागांसाठी १७२ उमेदवार आहेत. मुरु डमध्ये सरपंचपदासाठी १२ जागा असून, ३४ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी ९७ जागा असून, २३९ उमेदवार रिंगणात आहेत.>अलिबागमध्ये ४७ उमेदवार रिंंगणातअलिबागमध्ये १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी थेट सरपंचपदांच्या १५ जागांसाठी ४७ तर सदस्यपदाच्या १५७ जागांसाठी ३४४ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे.तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसल्याने येथे शिवसेना, काँग्रेस, शेकाप अशा लढती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तिन्ही राजकीय पक्षांनी आपापली व्यूहरचना आखून विजयाचे फासे आपल्याच बाजूने कसे पडतील याची तयारी सुरू केली आहे.आवास, रेवदंडा, कामार्ले, मानकुळे, खानाव मिळकतखार या श्रीमंत ग्रामपंचायती म्हणून ओळखल्या जातात. येथील ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना लुभवण्यासाठी विविध आमिषेदाखवली जाण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच चुरस अनुभवाला मिळणार आहे. यासह वाडगाव, किहीम, शहाबाज, पेढांबे, वाघ्रण, चिंचवळी, खंडाळे, खिडकी, नागाव या ग्रामपंचायतींमध्येही निवडणूक रंगतदार होणार आहे. अलिबागमध्ये शिवसेना विरु ध्द शेकाप लढत होत आहे.रेवदंड्यात शेकाप विरु द्ध शिवसेना, आवासमध्ये काँग्रेस विरु द्ध शेकाप, खानावमध्ये काँग्रेस विरु द्ध शेकाप, शहाबाजमध्ये शेकाप विरु द्ध काँग्रेस, पेढांबे शेकाप विरु द्ध काँग्रेस, मानकुळे शेकाप विरु द्ध काँग्रेस, वाघ्रण शेकाप विरु द्ध काँग्रेस, कामार्ले शेकाप विरु द्ध काँग्रेस, चिंचवली काँग्रेस विरु द्ध शेकाप, खंडाळे शेकाप विरु द्ध काँग्रेस अशा निवडणुका होत आहेत.म्हसळ्यात दोन ग्रामपंचायती बिनविरोधम्हसळा : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यापैकी ठाकरोली आणि जांभूळ या दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आल्याने १० ग्रामपंचायतीतील थेट सरपंच व सदस्यांची निवडणूक होत आहे. वरवठणे, पांगलोली, कुडगाव, चिखलप, भेकºयाचा कोंड, कोळवट, नेवरु ळ, घूम, साळविंडे, आडी-महाड-खाडी या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. एकूण ८८ सदस्यांपैकी ५१ सदस्य बिनविरोध झाले असून उर्वरित २७ सदस्यांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत.तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि चुरशीची होणाºया पांगलोली ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी म्हसळा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलिशेठ कौचाली यांचे चिरंजीव बिलाल कौचाली तर काँग्रेसतर्फे म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.मुईज शेख यांचे वडील डॉ.अब्दुल अजीज शेख यांच्यात लढत होत आहे. डॉ.अब्दुल अजीज शेख हे गेली ४० ते ४५ वर्षे परिसरात वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. गेली २५ वर्षे जांभूळ ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते, परंतु या वेळी ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली असून सरपंचपदी सुशीला जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.>वासांबे, मोहोपाड्यातप्रचाराची रणधुमाळी सुरूमोहोपाडा : वासांबे, मोहोपाडा ग्रामपंचायत निवडणूक सरपंच व सदस्यांसह १७ जागांसाठी होणार असून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एक जागा बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला जास्त मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सदस्यपदासाठी १७ जागा आहेत, तर ३६ उमेदवार उभे ठाकले आहेत. कर्जतमध्ये सरपंचपदासाठी पाच जागा असून, १२ उमेदवार आहेत. सदस्यपदाच्या ३६ जागांवर ७५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. खालापूरमध्ये सरपंचपदासाठी १७ जागा असून, ४५ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी १४१ जागा असून, ३०० उमेदवार आहेत. माणगावमध्ये सरपंचपदासाठी १७ जागा आहेत, तर ४० उमेदवार राजकीय नशीब आजमावणार आहेत. सदस्यपदासाठी ८५ जागांवर १७३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.तळामध्ये सरपंचपदासाठी पाच जागा असून, १२ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी ११ जागा असून, २३ उमेदवार आहेत. रोहामध्ये सरपंचपदासाठी सात जागा असल्याने तेथे २१ उमेदवार सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत, तर सदस्यपदाच्या ५१ जागांसाठी ११७ उमेदवार आहेत.सुधागडमध्ये सरपंचपदासाठी १० जागा असून, २३ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदासाठी ७५ जागा असून, १६४ उमेदवार आहेत.महाडमध्ये सरपंचपदासाठी १३ जागांवर ४० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, तर सदस्यपदासाठी ४९ जागांसाठी १०१ उमेदवार आहेत. पोलादपूरमध्ये सरपंचपदासाठी आठ जागा असून, १७ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी ५३ जागांवर १०८ उमेदवार आहेत.श्रीवर्धनमध्ये सरपंचपदासाठी पाच जागा असून, १२ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी १८ जागा असून, ३७ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.म्हसळामध्ये सरपंचपदासाठी १० जागा असून, २२ उमेदवार रिंगणात आहेत, तसेच सदस्यपदासाठी २७ जागांसाठी ५५ उमेदवार आहेत.संपूर्ण जिल्ह्यात एकूण १४६ सरपंचपदाच्या जागांसाठी ३९१ उमेदवार, तर सदस्यपदाच्या ९९८ जागांसाठी २,१९१ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. जिल्ह्यातील ५२६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.पनवेलमध्ये सरपंचपदाच्या १४ जागांसाठी ३३ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत, तर ११७ सदस्यांच्या जागांसाठी २४७ उमेदवार आहेत. उरणमध्ये सरपंचपदासाठी एक जागा असून चार उमेदवार रिंगणात आहेत.