शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

कर्जतमध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी केली २,५०० वृक्षांची लागवड; राहुल धारकर महाविद्यालयाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:38 IST

राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय गेली दहा वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे.

कर्जत : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने जून २०१९ मध्ये वृक्षारोपण सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकूण २,५०० रोपांची लागवड केली. खरे तर महाविद्यालयात ३९० विद्यार्थी आणि ५५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. संख्येच्या तुलनेत सहापट वृक्ष लावून त्यांचे संवर्धनही सुरू आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी महाविद्यालयाला पुरस्कार देऊन सन्मानित केले.

राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय गेली दहा वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहे. नुसते वृक्षारोपण न करता दरवर्षी एक झाड विद्यार्थ्यांना दत्तक देतात. यंदा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेपेक्षा अधिक रोपांची लागवड व त्यांचे संवर्धन करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी विशेष सभेचे आयोजन करून ही संकल्पना चांगल्या प्रकारे राबविण्याचे ठरविले. या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी प्रा. प्रीतम जुवाटकर यांच्याकडे दिली. त्यांनी विविध कल्पना साकारून या उपक्रमाला सार्थ स्वरूप दिले.

जून २०१९ च्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून प्रामुख्याने विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया शिधये, स्टर्लिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. गाडगे, रायगड मेडिकल संघटनेचे अध्यक्ष लीलाधर पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहायक आयुक्त डॉ. साहेबराव साळुंखे, संतोष घोडविंदे आदी उपस्थित होते. दहा दिवस हा उपक्रम राबवून एकूण अडीच हजार रोपांची लागवड केली. तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली.

विशेष म्हणजे, या उपक्रमाला महाराष्ट्र शासन वन विभागाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या यशस्वी मोहिमेबद्दल अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी पुरस्कार जाहीर केला. नवी दिल्ली येथे महाविद्यालयाच्या वतीने प्रा. प्रीतम जुवाटकर उपस्थित होते. अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते महाविद्यालयाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रcollegeमहाविद्यालयenvironmentपर्यावरण