शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

२२ कोटींची कामे रखडली

By admin | Updated: August 8, 2015 22:08 IST

दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक

महाड : दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुरा निधी मिळाल्यामुळे या योजनेतील सुमारे २२ कोटी रु. पेक्षा अधिक कामे आज ठप्प झालेली आहेत. या योजनेच्या टप्पा दोनसाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून निधीच उपलब्ध करून न दिल्यामुळे ठेकेदारांपुढे कामे पूर्ण कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. तर स्थानिक ग्रामस्थांनाही रस्त्याचे काम रखडल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात ही पंतप्रधान ग्रामसडक योजना केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे लोकसंख्येवरील मुख्य रस्त्याला न जोडलेली गावे जोडणे, त्यापाठोपाठ पाचशे ते एक हजार लोकसंख्या असलेली गावे मजबूत रस्त्यांनी जोडणे असा कार्यक्रम या योजनेत राबविण्यात आला. या योजनेचा फायदा अनेक गावांना झाला. त्यानंतर टप्पा दोन अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याची कामे या योजनेत राबविण्यात आली. या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली रस्त्याची कामे समाधानकारक तसेच दर्जेदार असल्याचेही निदर्शनास आले. ही योजना नोव्हेंबर २०१४ पर्यंत व्यवस्थित सुरू होती. मात्र त्यानंतर या योजनेसाठी उर्वरित निधीच येणे बंद झाल्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यात निधीअभावी या योजनेतील नऊ कामे ठप्प झाली असून, आज ना उद्या या केलेल्या कामांना निधी येईल, या आशेवर ठेकेदारांनी सुमारे ७० ते ८० टक्के कामे केली आहेत. परंतु आता ठेकेदारांनीही हात टेकले आहेत. सुरुवातीला पाच ते पंचवीस लाख रुपयांचा निधी काम सुरू करण्यासाठी मिळाला. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने निधी देणेच बंद केल्याने ही कामे आज रखडली आहेत. यासाठी निधी मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. (वार्ताहर)